शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 00:35 IST

मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली.

रुग्णालये फुल्ल : लहान मुले सर्दी-पडशांनी त्रस्तभंडारा : मागील महिनाभरापासून कडाक्याचे उन्ह तापत होते. त्यातच बुधवारच्या रात्रीपासून गुरुवारला दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारला पुन्हा कडक उन्ह तापल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. परिणामी विषाणुजन्य आजार बळावले. लहान मुलांना सर्दी, पडशांनी ग्रासले असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही गर्दी दिसून आली.मागील १५ दिवसांपासून लहान मुले तापासह सर्दी व खोकल्यांनी ग्रस्त आहेत. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या भंडाऱ्यात सामान्य रुग्णालयात बालकांसाठी विशेष कक्ष आहे. याशिवाय शहरात सात ते आठ बालरोग तज्ज्ञांची खासगी रुग्णालये आहेत. शासकीय व खासगी या सर्वच रुग्णालयांमध्ये लहान मुलांना उपचारासाठी घेऊन आलेल्या पालकांची गर्दी दिसून आली. या रुग्णालयातील सर्वच खाटा बालरुग्णांनी फुल्ल दिसून आले.उकाडा वाढलामागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यावेळी कडाक्याचे उन्ह तापत होते. हे तापमान ३८ अंशावर पोहोचले. त्यानंतर गुरुवारला सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची झळ होती. त्यानंतर शुक्रवारला पाऊस गायब झाला आणि ऊन्ह तापले. आजचे तापमानही ३४ अंश नोंदविण्यात आले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विषाणुजन्य आजाराने ग्रासले आहे. गुरुवार व शुक्रवारला रुग्णालयात आलेल्या बालकांना ताप, सर्दी व पडसे अशी लक्षणे दिसून आली.मोठ्यांनाही सर्दी-पडसेलहान मुलांसह महिलाही सर्दीने त्रस्त दिसून आल्या. मुलांना रुग्णालयात आणलेल्या बहुतांश महिलाही तापाने होत्या. स्तनदा मातांना ताप असेल तर तिच्या बाळालाही ताप येतो. त्यामुळेही मुलांच्या आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. (जिल्हा प्रतिनिधी)बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे बदलत्या हवामानाचा लहान मुलांवर लवकर परिणाम होतो. मागील काही दिवसांपासून तापणारे ऊन्ह आणि गुरुवारला आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. हा विषाणुजन्य आजार असून पालकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करावा.- डॉ.यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.