शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर निर्बंध

By admin | Updated: July 9, 2015 00:36 IST

शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.

शासनाचे निर्देश : धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा फलक लावणे गरजेचेतुमसर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होण्याकरिता राज्य शासनाने शाळांच्या व शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर तसेच शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करण्यास बंदी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही शाळेच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोबतच धूम्रमान निषिद्धचा फलक लावणे आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.तंबाखूमुळे होणारे तरुणांचे मृत्यू ही टाळता येण्याजोगी गोष्ट आहे. भारतामध्ये दररोज अडीच हजार लोक तंबाखूशी संबंधित आजारामुळे मृत्यू पडतात. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वे (गॅट्स) च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. ग्लोबल यूथ तंबाखू सर्वेनुसार, भारतात १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्केपो जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात तंबाखूची सवय लागल्याने ही सवय सोडणे कठीण जाते व यामुळे विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो.शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये पाच हजार ५०० विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरुवात करतात आणि १५ वर्षे वयाखालील पाच लक्ष विद्यार्थी व्यसनाधीन बनतात. तंबाखू उत्पादक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना लक्ष केले जाते. भारतामध्ये आठ वर्षे वयापासून मुलांमध्ये तंबाखू सेवनाची सुरुवात होते. (तालुका प्रतिनिधी)प्रभावीपणे नियंत्रणकेंद्र शासनाने तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे कलम ६ नुसार शैक्षणिक संस्थापासून १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी, शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत आणि प्रत्येक मजल्यावर बंदी घातली आहे.