शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कटीबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:32 IST

केंद्रात व राज्यात काँग्रेस शासनाची सत्ता असतांना अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानाकरीता व विकासाकरीता अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत.

बाबा सिद्घीकी यांचे प्रतिपादन: अल्पसंख्यांक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभाभंडारा : केंद्रात व राज्यात काँग्रेस शासनाची सत्ता असतांना अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानाकरीता व विकासाकरीता अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. यानंतरही अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी व विकासासाठी काँग्रेस पक्ष नेहमी कटीबध्द राहणार आहे, असे प्रतिपादन बाबा सिद्धीकी यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी गठीत केलेली नागपूर विभागीय अल्पसंख्याक समितीच्या भंडारा जिल्ह्यात दौऱ्यानिमित्य पक्षाचे अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा गुरुदत्त मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव वंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून समितीचे सदस्य व प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, अल्पसंख्याक विभागीय अध्यक्ष ओवेश कादरी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊ त, पक्षनेता शमीम शेख, नगरसेवक पृथ्वी तांडेकर, अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, नवाब पटेल, मनोज बागडे, ब्रम्हानंद करंजेकर, अजय तुमसरे, मार्तंड भेंडारकर, महेंद्र निंबार्ते, महेमुद खान उपस्थित होते.आनंदराव वंजारी यांनी जिल्ह्यात सर्वधर्मसमभावाचे वातावरण असून नेहमी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाज जिल्हास्तरीय व शहरस्तरीय विकासात्मक मुद्दे हाती घेऊ न त्यांचा निवारण करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून करण्यात असल्याचे सांगीतले. जिया पटेल यांनी काँग्रेसच्या शासन काळात जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाकरीता राबविण्यात आलेल्या योजना व विकास कामाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष पे्रमसागर गणविर यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहील. कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन केले. यावेळी अल्पसंख्यांक समाजातील अनेक नागरिकानी विचार मांडले.याप्रसंगी भंडारा शहरातील प्रभाग क्र.९ मधील नागरिकांना काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जाबीर मालाधरी, शफी उल्ला खान, शब्बीर अंसारी, जहिर मालाधरी, ईरफान पठान, अखतर अंसारी, हाजी करिमुद्दीन पठान, नाजीम अहमद, अखिल मिस्त्री, हाजी ईसराईल शेख, मो. शफी सिद्धीकी, सोहेल खान, अयुब खान, अजमद शेख, सलीम भाई, हबीब खान, कलीम अशरफी, जब्बार खान, शहा बाबु, ईसराईल शेख, प्रभाग क्र.१३- मुब्बशीर भाई, मुन्नाभाई, रशीद खत्री, लियाकत अली यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे आयोजन शमीम शेख यांनी केले. संचालन प्रा. मकबुल वारसी व आभार प्रदर्शन सचिन घनमारे यांनी केले. यावेळी नाहीद परवेज, ईमरान पटेल, किशोर राऊ त, शाहिद अली, अयुब पटेल, मोहिश कुरेशी, सुरेश गोन्नाडे, संजय वरगंटीवार, गणेश निमजे, पराग खोब्रागडे, अखील तिवाडे, निखील कुंभलकर, विपुल खोब्रागडे, ईरफान पटेल, मुशीर पटेल, युसुफ पटेल, माजिद पटेल, उबेद पटेल, जाहिद पटेल, शहजाद पटेल, जफरभाई, साबिर भाई यांच्यासह समाजातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)