शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पाणी तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागावर

By admin | Updated: April 4, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे.

भंडारा : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे. परंतु या विभागात अनुभव व तज्ज्ञांची वाणवा आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.दरवर्षी दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होतो. त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाच्या अंतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा होत्या. त्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय प्रयोगशाळांच्या नियंत्रणातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ते सहा उपविभागीय प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. प्रयोगशाळांमधील सर्व कर्मचारी कंत्राट तत्वावर घेण्यात आले. पण त्यांच्यावर जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांचे नियंत्रण होते. त्यामुळे पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेणे, दूषित पाणी पुरवठ्याबाबत आरोग्य विभागातर्फे सूचना देणे, उपाययोजना करणे, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देऊन दूषित पाणी साठ्याबाबत प्रशासनाला दक्षतेच्या सूचना देणे, अशी कामे जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयातून सुरू होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ज्यांच्याकडे प्रयोग शाळेबाबत यंत्रणा नाही, तज्ज्ञ अधिकारी नाहीत त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. आरोय विभागाची जबाबदारी कमी झाली आहे. (प्रतिनिधी) यापूर्वीही झाला होता निर्णयराज्य शासनाने १ जानेवारीपासून पाणी गुणवत्ता तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता पण तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा तो निर्णय मागे घेत १ एप्रिल २०१५ पासून नवीन आर्थिक वर्षांपासून हस्तांतरीत करण्याचा आदेश काढला आहे. जिल्ह्यात उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळा आहेत. अशात राज्य शासनाने भूजल सर्वेक्षणासोबतच पाण्याची गुणवत्ताही आमच्या विभागातर्फे सांगण्यात येईल. नवी जबाबदारी आम्ही यशस्वी करू असे भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिक यांनी सांगितले.