शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

पाणी तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागावर

By admin | Updated: April 4, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे.

भंडारा : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांची जबाबदारी १ एप्रिलपासून भूजल सर्वेक्षण विभागाकडे आली आहे. परंतु या विभागात अनुभव व तज्ज्ञांची वाणवा आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.दरवर्षी दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होतो. त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाच्या अंतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा होत्या. त्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय प्रयोगशाळांच्या नियंत्रणातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ते सहा उपविभागीय प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. प्रयोगशाळांमधील सर्व कर्मचारी कंत्राट तत्वावर घेण्यात आले. पण त्यांच्यावर जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांचे नियंत्रण होते. त्यामुळे पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेणे, दूषित पाणी पुरवठ्याबाबत आरोग्य विभागातर्फे सूचना देणे, उपाययोजना करणे, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देऊन दूषित पाणी साठ्याबाबत प्रशासनाला दक्षतेच्या सूचना देणे, अशी कामे जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयातून सुरू होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ज्यांच्याकडे प्रयोग शाळेबाबत यंत्रणा नाही, तज्ज्ञ अधिकारी नाहीत त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. आरोय विभागाची जबाबदारी कमी झाली आहे. (प्रतिनिधी) यापूर्वीही झाला होता निर्णयराज्य शासनाने १ जानेवारीपासून पाणी गुणवत्ता तपासणीची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता पण तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा तो निर्णय मागे घेत १ एप्रिल २०१५ पासून नवीन आर्थिक वर्षांपासून हस्तांतरीत करण्याचा आदेश काढला आहे. जिल्ह्यात उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळा आहेत. अशात राज्य शासनाने भूजल सर्वेक्षणासोबतच पाण्याची गुणवत्ताही आमच्या विभागातर्फे सांगण्यात येईल. नवी जबाबदारी आम्ही यशस्वी करू असे भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिक यांनी सांगितले.