शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:43 IST

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना सव्वादोन कोटींचे पीक कर्ज वितरीतलोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ९५ टक्के शेतजमीनी वर्ग-१ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.लाखनी येथील स्वागत लॉन येथे आयोजित जिल्हास्तरीय महसुल दिन कार्यक्रमाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, अर्चना मोरे, स्मिता पाटील, तहसिलदार संजय पवार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक पाटील, लाखनीच्या नगराध्यक्ष ज्योतीताई निप्पाणे, मुरमाडीचे सरपंच सुनील भालेराव उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, २०१९ हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार असून भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार कोणताही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहता कामा नये. यासाठी समस्त जागरुक नागरिक व कर्मचाºयांनी दखल घ्यावी. सर्व नागरिकांची अचुक मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ई-वे आॅफिस संकल्पना राबविण्यात येत असून अर्जदारांच्या तक्रारींची दखल गंभीरतेने घेण्यात येईल. अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधितांना कळविण्यात येईल, असे ते म्हणाले.या प्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले की, राजस्व विभाग हे महत्वाचे असून समस्त नागरिकांचे जीवन या विभागावर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे अतिक्रमण पट्टेधारक शेतकºयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.प्रास्ताविकात अर्चना मोरे यांनी महसुल विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहे.तसेच साताबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या महसूल दिन कार्यक्रमात मान्यवरांचे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश, नैसर्गिक आपत्ती योजनेतील १२ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यतेचे धनादेश, सातबारा वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रुपांतरण झालेले ११ लाभार्थी, राशन कार्ड धारक ८ लाभार्थी तसेच मतदान ओखळपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसिलदार मलीक विरानी यांनी केले. या कार्यक्रमास सातही तहसिलचे तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.