शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:43 IST

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना सव्वादोन कोटींचे पीक कर्ज वितरीतलोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ९५ टक्के शेतजमीनी वर्ग-१ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.लाखनी येथील स्वागत लॉन येथे आयोजित जिल्हास्तरीय महसुल दिन कार्यक्रमाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, अर्चना मोरे, स्मिता पाटील, तहसिलदार संजय पवार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक पाटील, लाखनीच्या नगराध्यक्ष ज्योतीताई निप्पाणे, मुरमाडीचे सरपंच सुनील भालेराव उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, २०१९ हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार असून भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार कोणताही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहता कामा नये. यासाठी समस्त जागरुक नागरिक व कर्मचाºयांनी दखल घ्यावी. सर्व नागरिकांची अचुक मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ई-वे आॅफिस संकल्पना राबविण्यात येत असून अर्जदारांच्या तक्रारींची दखल गंभीरतेने घेण्यात येईल. अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधितांना कळविण्यात येईल, असे ते म्हणाले.या प्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले की, राजस्व विभाग हे महत्वाचे असून समस्त नागरिकांचे जीवन या विभागावर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे अतिक्रमण पट्टेधारक शेतकºयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.प्रास्ताविकात अर्चना मोरे यांनी महसुल विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहे.तसेच साताबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या महसूल दिन कार्यक्रमात मान्यवरांचे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश, नैसर्गिक आपत्ती योजनेतील १२ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यतेचे धनादेश, सातबारा वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रुपांतरण झालेले ११ लाभार्थी, राशन कार्ड धारक ८ लाभार्थी तसेच मतदान ओखळपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसिलदार मलीक विरानी यांनी केले. या कार्यक्रमास सातही तहसिलचे तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.