शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 12, 2015 00:39 IST

ओबीसींच्या जीवनाशी निगडीत मागण्यांवर सहानुभूतीने तथा गंभीरतेने विचार करून न्याय देण्यात यावे, ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : ओबीसी सेवा संघाची मागणीभंडारा : ओबीसींच्या जीवनाशी निगडीत मागण्यांवर सहानुभूतीने तथा गंभीरतेने विचार करून न्याय देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी सेवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षात ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीबाबत राज्य कर्त्याकडून गंभीरतेने विचार केला नाही. त्यामुळे आज ओबीसी समाजाची दयनिय अवस्था असून हलाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य घटनेतील ३४० कलमानुसार घटनात्मक संरक्षण असूनही लोकसंख्येच्या तुलनेत केंद्र आणि राज्यांच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जात नाही. नोकऱ्यामध्ये ओबीसीचा अनुशेष पूर्ण केला जात नाही. संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नौकर भरतीत सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली मंडळ आयोगाची शिफारस नाकारली जात आहे. व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या फ्रि सीप साठीची उत्पन्न मर्यादा ४.५० लाखावरून ६ लाख करण्याची सभागृहात वारंवार घोषणा केली जाते. परंतु शासन निर्णय घेत नाही. व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जाला कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणे, ओबीसींना लावलेले नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करणे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्हा स्थरावर वस्तीगृहाची व्यवस्था करणे, ओबीसी विद्यार्थ्यांकरीता एमपीएससी, युपीएससी मार्गदर्शन केंद्र चालविणे, ओबीसीसाठी एससी, एसटी प्रमाणे सर्व क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करणे, खासदार नचिअप्पन संसदीय समितीच्या शिफारशी लागू करणे, शेतकऱ्यांसाठी डॉ. स्वामीनाथक समितीची शिफारस लागू करणे, एससी, एसटी, एनटी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना केंद्र तसेच राज्य सरकारद्वारा देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, सवलती लागू करणे, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे आदी मागण्यांची पूर्तता करण्याची गरज आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ जानेवारी २०१६ प्रजासत्ताक दिनापासून ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य भर जनआंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सेवा संघाने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)