शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केले २७ समस्यांचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:27 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : दवडीपार येथील ९८ घरांचे होणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजूषा ठवकर, अधीक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या दवडीपार (बेला) येथील आंशिक पुनर्वसन संदर्भात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी अशा स्वरुपाच्या २२ गावांची बैठक घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नागपूर अधिवेशनात या संदर्भात जलसंधारण मंत्री यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दवडीपार येथील ९८ घरांचे पुनर्वसन करण्याबाबत व गोसेबाधित स्मशानभूमी करीता जागा मिळणेबाबत नागरिकांनी निवेदन सादर केले होते. स्मशानभूमी १५ आॅगस्टपूर्वी बांधून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मौजे चिचाळ येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत सादर निवेदनावर निर्णय देतांना पालकमंत्री यांनी ३० जूनला सदर इमारतीचे उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच पाणी टंचाईबाबत योग्य निर्णय घेण्याचे सांगितले.भंडारा शहर बायपास रोड दुरुस्तीकरण व अतिभार वाहतूक बंद करण्याबाबतच्या निवेदनावर तात्काळ निर्णय घेवून संबंधितांना सूचना केल्या. शासकीय आधारभूत धान खरेदीसाठी दिलेल्या गोदामाच्या भाडे संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त शेतकºयांना प्रकल्पात गेलेल्या जमीनीची वाढीव रक्कम, भिमलकसा जलाशयाचे पाणी मिळण्याबाबत, नेरला उपसा सिंचन अंतर्गत पिकाचा मोबदला मिळण्याबाबत, गोंडीटोला येथील तेंदु फाटा तलावाचे गेट दुरुस्तीकरण, बावनथडी प्रकल्प उजवा कलवावरुन पाईपलाईन व मौजा सामेवाडा, तालुका लाखनी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणी उपलब्ध करुन देणे आदी महत्त्वाच्या समस्या पालकमंत्री यांनी या बैठकीत निकाली काढल्या. त्याच प्रमाणे अनेक नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्यांचे निवेदन सादर केली होती. या निवेदनावर पालकमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेवून न्याय देण्याची भूमिका बजावली. यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा केला.