शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विकासात जिल्हा अव्वल ठेवण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:25 IST

प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : महसूल दिनानिमित्त विविध प्रमाणपत्राचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. आजच्या महसूल दिनानिमित्त सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासोबतच आपला जिल्हा विकासात अव्वलस्थानी नेण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व तहसिलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल दिनाचे महत्व विषद केले. यासोबत पीएम किसान योजना अभिलेख्याचे संगणकीकरण, आयुष्मान भारत, घरपोच प्रमाणपत्र या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.कुटूंब अर्थसहाय्य योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अभियानांतर्गत अंत्योदय शिधापत्रिका, उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस किट व सिलिंडरचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. त्याचप्रमाणे वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतरीत केलेले सातबारा नागरिकांना वाटप करण्यात आले.प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी केले. शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विलास ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तहसिलदार अक्षय पोयाम यांनी केले. कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी