शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:32 IST

राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहिती : पुनर्वसन रखडले, न्यायासाठी प्रकल्पबाधित कुटुंबाचा एल्गार

ऑनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. सर्व प्रकल्पबाधीत यासाठी निवासी जनआंदोलन करणार असल्याची माहिती शनिवारला प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाकमोडे, एजाज अली, भंडारा तालुका प्रमुख मंगेश वंजारी, रवि मने, चारूल रामटेके, सुनिल कहालकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला निर्वानिचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सदर आंदोलन २१ फेब्रुवारीला मेंढा पुनर्वसन ते राजीव टेकडीदरम्यान पटाचे बरड येथे होत असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान रक्तदान करून 'रक्त घ्या परंतु न्याय द्या' अशी मागणी करणारे अभिनव रक्तदान शिबिर यावेळी करण्यात येणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. गोसीखुर्द प्रकल्पात ८५ गावे व १८२ शेतशिवार बाधित झाले आहेत.या प्रकल्पाला ३० वर्षांचा कालावधी लोटला असून सरकार यावर कोट्यवधींचा खर्च करीत असताना प्रकल्पबाधीतांना मात्र वाºयावर सोडल्याचा आरोप पत्रपरिषदेतून प्रकल्पबाधीतांनी केला आहे. पत्रपरिषदेला यशवंत टिचकुले, मारोती हारगुडे, रूपेश आतीलकर, देवा रामटेके, सुनिल हटवार, महेश दिवटे, अनिल दुधकवर, गुलाब सेलोकर, वाल्मिक नागपुरे, श्रावण उके आदी उपस्थित होते.