शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धरण रिकामे करण्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:29 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे.

एप्रिल अखेर धरणाची पातळी २३७.२०० मीटरवरपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा रिकामे करण्यात येत आहे. एप्रिल अखेर हे धरण पूर्णत रिकामे केले जाणार आहे.गोसेखुर्द धरण बांधण्याच्या वेळेस धरणातील पाणी वाहून जाण्याकरिता पायथ्याजवळ चार भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते. या भूमिगत बोगद्यातून धरणातील तळाचे पाणी वाहून जात होते. धरण पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केला आहे. चारही भूमिगत बोगदे बंद करण्याचे काम तेवढे शिल्लक होते.यावर्षी गोसेखुर्द धरणामध्ये २४२ मीटरचा दुसरा टप्पा म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी २४२.५०० मीटरपर्यंत पाणी साठविण्यात आले होते. परंतु चारही भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्यामुळे काही दिवसांपासून धरणातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. सर्व बाबींचा विचार करून पाणी सोडले जात आहे. परंतु वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत नाही. त्यामुळे धरणातून सुरक्षितरित्या पाणी सोडले जात आहे. धरणाचे काम ३१ मेपर्यंत करावयाचे आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. धरणातील पाण्याची पातळी २४२.५०० मीटरवरून कमी केली आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन २३९.३०० मीटर झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत २३७.२०० मीटरपर्यंत पाण्याची पातळी कमी केली जाणार आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावातील प्रकल्पग्रस्तांना आपले साहित्य काढण्याकरिता सोपे जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)