शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धरण रिकामे करण्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:29 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे.

एप्रिल अखेर धरणाची पातळी २३७.२०० मीटरवरपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा रिकामे करण्यात येत आहे. एप्रिल अखेर हे धरण पूर्णत रिकामे केले जाणार आहे.गोसेखुर्द धरण बांधण्याच्या वेळेस धरणातील पाणी वाहून जाण्याकरिता पायथ्याजवळ चार भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते. या भूमिगत बोगद्यातून धरणातील तळाचे पाणी वाहून जात होते. धरण पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केला आहे. चारही भूमिगत बोगदे बंद करण्याचे काम तेवढे शिल्लक होते.यावर्षी गोसेखुर्द धरणामध्ये २४२ मीटरचा दुसरा टप्पा म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी २४२.५०० मीटरपर्यंत पाणी साठविण्यात आले होते. परंतु चारही भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्यामुळे काही दिवसांपासून धरणातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. सर्व बाबींचा विचार करून पाणी सोडले जात आहे. परंतु वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत नाही. त्यामुळे धरणातून सुरक्षितरित्या पाणी सोडले जात आहे. धरणाचे काम ३१ मेपर्यंत करावयाचे आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. धरणातील पाण्याची पातळी २४२.५०० मीटरवरून कमी केली आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन २३९.३०० मीटर झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत २३७.२०० मीटरपर्यंत पाण्याची पातळी कमी केली जाणार आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावातील प्रकल्पग्रस्तांना आपले साहित्य काढण्याकरिता सोपे जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)