शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरण रिकामे करण्याचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:29 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे.

एप्रिल अखेर धरणाची पातळी २३७.२०० मीटरवरपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा रिकामे करण्यात येत आहे. एप्रिल अखेर हे धरण पूर्णत रिकामे केले जाणार आहे.गोसेखुर्द धरण बांधण्याच्या वेळेस धरणातील पाणी वाहून जाण्याकरिता पायथ्याजवळ चार भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते. या भूमिगत बोगद्यातून धरणातील तळाचे पाणी वाहून जात होते. धरण पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केला आहे. चारही भूमिगत बोगदे बंद करण्याचे काम तेवढे शिल्लक होते.यावर्षी गोसेखुर्द धरणामध्ये २४२ मीटरचा दुसरा टप्पा म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी २४२.५०० मीटरपर्यंत पाणी साठविण्यात आले होते. परंतु चारही भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्यामुळे काही दिवसांपासून धरणातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. सर्व बाबींचा विचार करून पाणी सोडले जात आहे. परंतु वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत नाही. त्यामुळे धरणातून सुरक्षितरित्या पाणी सोडले जात आहे. धरणाचे काम ३१ मेपर्यंत करावयाचे आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. धरणातील पाण्याची पातळी २४२.५०० मीटरवरून कमी केली आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन २३९.३०० मीटर झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत २३७.२०० मीटरपर्यंत पाण्याची पातळी कमी केली जाणार आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावातील प्रकल्पग्रस्तांना आपले साहित्य काढण्याकरिता सोपे जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)