शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन

By admin | Updated: June 21, 2014 01:02 IST

गोसी खुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चिचखेडा या गावाच्या समस्या सोडविण्याकरीता मागण्यांचे निवेदन

पवनी : गोसी खुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चिचखेडा या गावाच्या समस्या सोडविण्याकरीता मागण्यांचे निवेदन गोसीखुर्द संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे व युवा आघाडीचे गुलाब मेश्राम यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव यांना वाही विश्रामगृहात देण्यात आले.या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन गावठाणात ६० टक्केच्या वर प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झाल्यामुळे याला महसुल गावाचा दर्जा देऊन वेगळी ग्रामपंचायत मिळावी. चिचखेडावासीयांची शेती जवळच्याच मुरमाडी येथे आहे. त्यांनाही १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन अनुदान पॅकेजचा लाभ मिळावा. नवीन गावठाणात बौद्ध विहाराला मोबदला, व्याज, पुनर्वसन अनुदान देऊन नवीन गावठाणात भूखंड मिळावा, नवीन गावठाणात नळ योजना, व्यापारी संकुल, सिमेंट क्राँक्रीट नाल्यांची निर्मिती व्हावी, लक्ष्मण ईखार या चिचखेडा येथील प्रकल्पग्रस्ताला सर्व मोबदला मिळाला. त्याचे नाव अवार्डमध्येही असतानाही सुद्धा त्याला १२०० कोटी रुपयाच्या पॅकेजच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या पॅकेजचा लाभ लक्ष्मण ईखार यांना देण्यात यावा. वाढलेल्या २९ कुटुंबाला नवीन गावठाणात भूखंड मिळाले आहेत. त्यांना घर बांधणी अनुदान ६८,५०० रुपये मिळावे व ज्याप्रकारे पाथरी येथील प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त पॅकेजचा लाभ मिळाला तश्याच प्रकारचा लाभ चिचखेडा येथील प्रकल्पग्रस्तांना मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे.या मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव यांनी शिष्टमंडळाला दिला आहे. शिष्टमंडळात अनेक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)