शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

परप्रांतीय तांदळाचा अहवाल शासनदरबारी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प ...

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प झाली आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाने साधी चौकशी केली नाही. यामुळे दलाल आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजारांची वाटमारी झाली होती. या वाटमारीत आठ जणांना अटकही करण्यात आली. त्यात परप्रांतीय तांदळाचे तस्करी प्रकरण पुढे आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी तांदळाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविला. मात्र, तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप अहवाल आला नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी थांबली आहे. यावरून तांदळाचे व्यापारी आणि पुरवठा विभाग यांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.

भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतो. मात्र, भंडारा जिल्ह्यातच तांदळावर अन्याय केला जात आहे. परप्रांतीय तांदळाची आयात करून जास्त पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान तेलंगणाच्या तांदूळ व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार तो व्यापारी साकोली पोलीस ठाण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्याने तांदळाचे बिल पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हा परप्रांतीय तांदूळ महाराष्ट्रात आणून विकता येतो का, हा प्रश्न कायम आहे.

बाॅक्स

त्या तांदळाची सखोल चौकशी हवी

साकोली तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती आहे. हा तांदूळ महाराष्ट्रात कसा आणला? यात कोण आहे ? या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागू शकते.