शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

परप्रांतीय तांदळाचा अहवाल शासनदरबारी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प ...

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प झाली आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाने साधी चौकशी केली नाही. यामुळे दलाल आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजारांची वाटमारी झाली होती. या वाटमारीत आठ जणांना अटकही करण्यात आली. त्यात परप्रांतीय तांदळाचे तस्करी प्रकरण पुढे आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी तांदळाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविला. मात्र, तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप अहवाल आला नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी थांबली आहे. यावरून तांदळाचे व्यापारी आणि पुरवठा विभाग यांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.

भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतो. मात्र, भंडारा जिल्ह्यातच तांदळावर अन्याय केला जात आहे. परप्रांतीय तांदळाची आयात करून जास्त पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान तेलंगणाच्या तांदूळ व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार तो व्यापारी साकोली पोलीस ठाण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्याने तांदळाचे बिल पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हा परप्रांतीय तांदूळ महाराष्ट्रात आणून विकता येतो का, हा प्रश्न कायम आहे.

बाॅक्स

त्या तांदळाची सखोल चौकशी हवी

साकोली तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती आहे. हा तांदूळ महाराष्ट्रात कसा आणला? यात कोण आहे ? या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागू शकते.