शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परप्रांतीय तांदळाचा अहवाल शासनदरबारी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प ...

साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प झाली आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाने साधी चौकशी केली नाही. यामुळे दलाल आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजारांची वाटमारी झाली होती. या वाटमारीत आठ जणांना अटकही करण्यात आली. त्यात परप्रांतीय तांदळाचे तस्करी प्रकरण पुढे आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी तांदळाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविला. मात्र, तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप अहवाल आला नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी थांबली आहे. यावरून तांदळाचे व्यापारी आणि पुरवठा विभाग यांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.

भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतो. मात्र, भंडारा जिल्ह्यातच तांदळावर अन्याय केला जात आहे. परप्रांतीय तांदळाची आयात करून जास्त पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान तेलंगणाच्या तांदूळ व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार तो व्यापारी साकोली पोलीस ठाण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्याने तांदळाचे बिल पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हा परप्रांतीय तांदूळ महाराष्ट्रात आणून विकता येतो का, हा प्रश्न कायम आहे.

बाॅक्स

त्या तांदळाची सखोल चौकशी हवी

साकोली तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती आहे. हा तांदूळ महाराष्ट्रात कसा आणला? यात कोण आहे ? या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागू शकते.