शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘त्या’ शिक्षकांवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: June 18, 2016 00:28 IST

आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात,

मासळ : आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात, असाच काहीसा प्रकार शिक्षक बदली प्रकरणात सध्या अनुभवास येत आहे.मुठभर शिक्षकावर तथाकचित झालेल्या अन्यायाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी शासनापर्यंत तक्रार दाखल केल्या व त्याचे पर्यवसान बदलीस स्थगिती असा झाला. शिक्षक संघटना नेहमीच शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध लढत असतात. परंतु त्यावर किंचितही विचार न करता आंदोलने, उपोषणे करून टोकाची भूमिका घेत असतात. त्याचा विपरीत परिणाम काय होईल, याचा विचारही करित नाही. बदली झालेले बहुसंख्य शिक्षक आनंदी आहेत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच ठिकाणी नक्षलग्रस्त भागात ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक यावर्षी मात्र चांगले दिवस आले म्हणून खुष असतानाच, मुठभर शिक्षकांची बाजु घेणाऱ्या शिक्षक संघटनांना बहुसंख्येने आदिवासी नक्षल प्रभावित भागात काम करणाऱ्या आपल्याच शिक्षक बांधवांचा विसर पडला. स्वमर्जीतील शिक्षक सहकार्यांचे अडचणी, प्रश्न तक्रारकर्त्यांना मोठे वाटले परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्षापासून जे सहकारी शिक्षक आपल्या आई-वडिलांचे आजारपण, पत्नीचे पतीचे आजारपण, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, कौटुंबिक गरजांसाठी आजपर्यंत स्व तालुक्यात किंवा बगर नक्षलग्रस्त तालुक्यात येण्यासाठी धडपडत होते, त्यांचा या तथाकचित संघटनांनी किंचितही विचार केला नाही आणि आमचा विजय झाला, आम्ही जिंकलो या अविर्भावात बदल्यांना स्थगिती मिळविली. संघटनात्मक कामासाठी शिक्षकांनी संघटनेला वेळोवेळी बळ दिले. आता मात्र त्यांच्या आनंद यांच्या डोळ्यात सलायला लागला हे कितपत योग्य आहे, ही बाब समजून घ्यायला अन्य विसरलेत. (वार्ताहर)