शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

साकोली-लाखनी तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा

By admin | Updated: August 28, 2015 01:04 IST

लाखनी, साकोली तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनीचे प्रलंबित प्रकरणे क प्रत, नकाशा दुरुस्ती सीमांकीत निश्चित करणे,...

एसडीओंना निवेदन : शेतकऱ्यांची मागणीलाखनी : लाखनी, साकोली तालुक्यात महाराजस्व अभियानाद्वारे शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनीचे प्रलंबित प्रकरणे क प्रत, नकाशा दुरुस्ती सीमांकीत निश्चित करणे, गाव नकाशामध्ये नोंद घेणे आणि शेतकऱ्यांचे अतिक्रमण पट्टे वनदावे मजूर करण्यात यावे, अशी मागणी साकोली व लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये सन १९८० पासून शेतजमिनीची पुर्नमोजणी झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची गाव नकाशामध्ये नोंद झाली नाही. साकोली तालुका भूमी अभिलेख कार्यालयात नकाशा दुरुस्ती सीमांकन निश्चित करणे व पोटहिस्सा मोजणीचे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहतो. पोटहिस्सा मोजणीचे असंख्य प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयात आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी शेतकऱ्यांना नकाशात त्रुटी आहेत, असे सांगून पूर्णमोजणी झाल्यावर आम्ही नकाशा वेगळा करू असे कारण सांगून शेतकऱ्यांना कार्यालयातून परत पाठवितात. शेतकऱ्यांकडे जमिनीची क प्रत आहे. परंतु तलाठी जवळील गाव नकाशामध्ये त्याची नोंद नाही. नियमानुसार कब्जा प्रत प्राप्त झाल्यानंतर ठराविक दिवसाची त्याची नोंद गाव नकाशामध्ये घ्यावी लागते. परंतु भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या कामासाठी मुळीच वेळ नाही. शेतकरी दुष्काळस्थिती, सावकारी कर्ज, लहरी हवामान यापासून आधीच खचला आहे. सातबारा उताऱ्यानुसार त्याच्या जमिनीची गाव नकाशामध्ये नोंद नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. तुमसर, मोहाडी तालुक् यात महाराजस्व अभियानाद्वारे ही मोहीम राबविली आहे. त्याचप्रकारे ही मोहीम साकोली व लाखनी तालुक्यात सुद्धा राबविण्यात यावी तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले वनहक्क दावे वन अधिकाऱ्यामार्फत आवश्यक कागदपत्राचा पुरवठा करून उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली येथे पट्टे मंजूर करण्याकरिता पाठविलेले आहे. परंतु वनहक्क दावे कार्यालयात मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. कृषीप्रधान देशात तर शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार नाही तर शेतकरी हा नेहमी अच्छे दिन येणार, या आशेवरच राहील. (तालुका प्रतिनिधी)