शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढला जातोय तलावातील गाळ

By admin | Updated: May 15, 2017 00:27 IST

दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.

योजनांचा लाभ मिळणार : ‘चुलरडोह’ नागपूर विभागातील प्रथम गावलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. ही बाब विचारात घेवू शासनाने ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविणारे तुमसर तालुक्यातील चुलरडोह हे गाव नागपूर विभागातील प्रथम ठरले आहे.बुद्ध पोर्णिमेच्या पर्वावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवणूक क्षमता पुर्न:स्थापित होण्याबराबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. या निर्णयाला प्रतिसाद देत तुमसर तालुक्यातील चुलरडोह या गावाने लघुपाटबंधारे जिल्हा परिषदच्या माजी मालगुजारी तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य तुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. एस. पराते, तहसिलदार गजेंन्द्र बालपांडे, उपसरपंच रामटेके व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चुल्हारडोह हे गाव दुष्काळग्रस्त असून जलयुक्त शिवार योजना २०१७-१८ मध्ये या गावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त गावातील लोकांनी लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत कौतूक केले.