शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

निराधारांची प्रलंबित प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 23, 2015 01:15 IST

अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे निराधारांची २०२ प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्याचा विक्रम तहसिलदार मडावी यांनी केला.

मोहाडी : अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे निराधारांची २०२ प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्याचा विक्रम तहसिलदार मडावी यांनी केला.शासनाच्या पेन्शन योजनेत समाविष्ठ असणाऱ्या योजनेची प्रकरणे अडली होती. संजय गांधी निराधार समितीचे गठन झाले नाही. तसेच उपविभागीय अधिकारी यांना कामामुळे न मिळणारा वेळ यामुळे अनेक दिवसापासून निराधारांची प्रकरणे बंद फाईलीत पडून होती. अशातच महाराष्ट्र शासनाने ज्या ठिकाणी समित्यांचे गठन नाही अशा ठिकाणच्या तहसिलदारांनी निराधारांची प्रकरणे मंजूर करावे, असे आदेश काढले. तहसिलदार मडावी यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. कपाटातून प्रकरणे तहसिलदाराच्या टेबलवर आले. व्यस्त कामातून वेळ काढून तहसीलदार मडावी यांनी श्रावणबाळ योजनेच्या ९० प्रकरणे, संजय गांधी निराधार योजनेची ६०, इंदिरा गांधी योजनेतील विधवांची २५ प्रकरणे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची २६ तर अपंगाचा एक प्रकरण एका दिवसात निकाली काढले आहे. तथापि, काही मंजूर झालेली प्रकरणात तत्कालीन तहसिलदारांनी काढून ठेवल्या आहेत. यामुळे दोन दोन वर्षाची श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे आजही निकालात काढण्यात आली नाहीत. तसेच ज्यांची प्रकरणे मंजूर झाली नाही. विविध कारणामुळे काही लाभार्थ्यांना लेखी कळविण्यात न आल्याने आजही बरेच निराधार अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. (तालुका प्रतिनिधी)