शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात आटला माणुसकीचा धर्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

तुमसर : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणताही माणुसकीचा मोठा धर्म नाही असे बोलले जाते. त्यामुळेच उन्हाळा आला की ...

तुमसर : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणताही माणुसकीचा मोठा धर्म नाही असे बोलले जाते. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागातही सामाजिक भान म्हणून मोठ्या प्रमाणात पाणपोई उभारल्या जात होत्या. मात्र, काही वर्षापासून या सामाजिक कार्यात हातभार लावणाऱ्या सामाजिक संस्थांनी आखडता हात घेतल्याने तुमसरात जणू काही माणुसकीचा धर्मच आटल्याची प्रचिती येत आहे.

तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे कार्य केले जायचे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरूंसाठी पाणपोई सुरू करीत होत्या. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायचे. त्यानंतरच पुढचा मार्ग धरायचे. असे काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शहरासह ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक ग्रामस्थांची वा तहानलेल्या वाटसरूची तहान कमी झालेली नाही. परंतु, समाजातला सेवाभाव संपत चालल्याने आणि माणुसकीचा धर्म आटल्याने एकेकाळी तुमसर शहरात ठिकठिकाणी दिसणारी पाणपोईची वर्दळ तर सोडाच, पाणपोईची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.

सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात. या ठिकाणी रस्त्यावरून जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.

कोरोनाच्या सावटात आताच्या प्रखर उन्हाळ्यात येणाऱ्या, जाणाऱ्या वाटसरू, बेघर, भटक्या लोकांना उन्हाळ्यात थंड पाण्याने तहान भागविता यावी, काही वेळ निवांत बसून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताचा मंडप घातलेल्या सावलीचा आसरा घेत उन्हाच्या दाहकतेने कोरडा झालेला घसा ओला करून तृष्णा तृप्ती करण्यासाठी पाणपोई उपयोगी होत्या. मात्र, अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वाटसरूंची तृष्णा भागविणाऱ्या पाणपोई कोरोना काळात हिरावल्या गेल्याचे दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग व त्याची भीती यामुळे प्रवाशांनी आपल्या तृष्णेचा पर्यायही आता बाळगायला सुरुवात केली आहे. त्यात मोफत असलेली पाणी ही नैसर्गिक संपत्तीही सध्या बाॅटल बंद झाली व त्याचीच सध्या खरेदीही तहान भागविण्याचे मुख्य साधन बनले आहे.