शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

तुमसरात आटला माणुसकीचा धर्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

तुमसर : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणताही माणुसकीचा मोठा धर्म नाही असे बोलले जाते. त्यामुळेच उन्हाळा आला की ...

तुमसर : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणताही माणुसकीचा मोठा धर्म नाही असे बोलले जाते. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागातही सामाजिक भान म्हणून मोठ्या प्रमाणात पाणपोई उभारल्या जात होत्या. मात्र, काही वर्षापासून या सामाजिक कार्यात हातभार लावणाऱ्या सामाजिक संस्थांनी आखडता हात घेतल्याने तुमसरात जणू काही माणुसकीचा धर्मच आटल्याची प्रचिती येत आहे.

तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे कार्य केले जायचे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरूंसाठी पाणपोई सुरू करीत होत्या. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायचे. त्यानंतरच पुढचा मार्ग धरायचे. असे काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शहरासह ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक ग्रामस्थांची वा तहानलेल्या वाटसरूची तहान कमी झालेली नाही. परंतु, समाजातला सेवाभाव संपत चालल्याने आणि माणुसकीचा धर्म आटल्याने एकेकाळी तुमसर शहरात ठिकठिकाणी दिसणारी पाणपोईची वर्दळ तर सोडाच, पाणपोईची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.

सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात. या ठिकाणी रस्त्यावरून जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.

कोरोनाच्या सावटात आताच्या प्रखर उन्हाळ्यात येणाऱ्या, जाणाऱ्या वाटसरू, बेघर, भटक्या लोकांना उन्हाळ्यात थंड पाण्याने तहान भागविता यावी, काही वेळ निवांत बसून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताचा मंडप घातलेल्या सावलीचा आसरा घेत उन्हाच्या दाहकतेने कोरडा झालेला घसा ओला करून तृष्णा तृप्ती करण्यासाठी पाणपोई उपयोगी होत्या. मात्र, अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वाटसरूंची तृष्णा भागविणाऱ्या पाणपोई कोरोना काळात हिरावल्या गेल्याचे दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग व त्याची भीती यामुळे प्रवाशांनी आपल्या तृष्णेचा पर्यायही आता बाळगायला सुरुवात केली आहे. त्यात मोफत असलेली पाणी ही नैसर्गिक संपत्तीही सध्या बाॅटल बंद झाली व त्याचीच सध्या खरेदीही तहान भागविण्याचे मुख्य साधन बनले आहे.