शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिला आहे.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाचे आदेश : सेवा नियमितेसाठी कर्मचारी महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील जिल्हा, पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधण केंद्रातील कंत्राटी कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिला आहे.त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत पाणी व स्वच्छता मिशनच्या कंत्राटी कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना २७ जुलैपासून सेवा समाप्त करण्याचा आदेश काढला होता. यावर कंत्राटी कर्मचारी संघाने पाठपुरावा केल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानंतर कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या निर्णयाविरूद्ध कंत्राटी कर्मचारी महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.२६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये कंत्राटी कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यात आणि मुदतवाढ देण्याच्या शासनाच्या पत्रास पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे राज्यातील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाल्याने कर्मचारी महासंघाने शासनाचे आभार मानले आहेत.हे सर्व कंत्राटी कर्मचारी १८ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना कमी करून आऊटसोर्सिंग करू नये यासाठी शासनाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी पत्र काढून जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचाºयांची सेवा कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक काढले आहे.कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला अखेर स्थगितीपाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या, अशा सूचना काही आमदारांकडून देण्यात आल्या होत्या. विधानभवनात यासंदर्भात बैठक झाली. त्याबैठकीत कर्मचाºयांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार काही आमदार व कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे राज्यातील ११०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.