भंडारा : बावनथडी प्रकल्प (राजीव गांधी) प्रकल्प हा मागील ४० वर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा लाभ तुमसर, मोहाडी व भंडारा तालुक्यातील ७७ गावांना होत आहे व मिळणार्या लाभामुळे या ७७ गावांना प्रकल्प कायदा लागलेला आहे व त्यामुळे मागील ४० वर्षापासून जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार, वारसान, फेरफार थांबले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी बर्याचदा मागणी करूनसुद्धा प्रतिबंध (प्रकल्प कायदा) शिथिल करण्यात आलेला नाही. परंतु आता प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या १५ दिवसात प्रतिबंध प्रकल्प कायदा) शिथिल करावा. तर १५ दिवसात प्रतिबंध (प्रकल्प कायदा) शिथील झाला नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ.अनिल बावनकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रकल्प कायदा शिथिल करा
By admin | Updated: May 23, 2014 23:39 IST