शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

न्यू नागझिरा अभयारण्यांतर्गत पुनर्वसनाचे काम रखडले

By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST

जिल्ह्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या न्यु नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

भंडारा : जिल्ह्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या न्यु नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच वन विभागाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यात अडचण निर्माण होत आहे.जिल्ह्यात न्यु नागझिरा हे अभयारण्य नव्याने अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे पवनी तालुक्यातील काही जंगलाचा भाग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेला आहे. कोका जंगलाचा परिसर पुर्वीपासून जंगलव्याप्त असून यापूर्वी तो वन विकास महामंडळाकडे होता. आता हा भाग अभयारण्यात आला असून वन्यजीव विभागाच्या अधिकारकक्षेत आहे. अभयारण्यातून वनोपज आणण्यास मनाई असल्यामुळे साकोली, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील दीड डझन गावातील नागरिक त्यांच्या पत्रावळी तयार करणे, मध गोळा करणे, डिंक व लाख उत्पादन घेणे असे व्यवसाय करू शकत नाहीत. लोकांना त्यांचा अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला परंपरागत व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचा सामना करण्याची वेळ आली आहे. गावांच्या जवळपर्यंत हिंस्त्र प्राण्यांचा शिरकाव झाल्यामुळे शेतात काम करणारेही शेतकरी व मजुरांसाठी असुरक्षित झाले आहे.शेतातील पिकांचे तृणभक्षी प्राणी नुकसान करतात. याबाबत शेतकऱ्यांनी प्रतिबंधासाठी कारवाईचा ससेमिरा सोसावा लागत आहे. पवनी तालुक्यातील ढोरप येथे काही महिन्यापुर्वी घरात बिबट्या शिरला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या अभयारण्याच्या हद्दीतील गावातील शेतकरी व नागरिकांचा व्यवसाय व शेती कसणे अशक्य होत आहे.अद्याप संबंधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या वाढणे चांगली बाब आहे. परंतु, त्यामुळे नागरी वस्त्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखनी तालुक्यातील गावांमध्ये बछड्यांसह वाघिणीची उपस्थिती होती. त्या भागात शेतात जाण्यास बरेच दिवसपर्यंत मजूर तयार नव्हते. हीच बाब साकोली तालुक्यातील उसगाव, चांदोरी या गावांत आहे. (नगर प्रतिनिधी)