शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

न्यू नागझिरा अभयारण्यांतर्गत पुनर्वसनाचे काम रखडले

By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST

जिल्ह्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या न्यु नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

भंडारा : जिल्ह्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या न्यु नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच वन विभागाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यात अडचण निर्माण होत आहे.जिल्ह्यात न्यु नागझिरा हे अभयारण्य नव्याने अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे पवनी तालुक्यातील काही जंगलाचा भाग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेला आहे. कोका जंगलाचा परिसर पुर्वीपासून जंगलव्याप्त असून यापूर्वी तो वन विकास महामंडळाकडे होता. आता हा भाग अभयारण्यात आला असून वन्यजीव विभागाच्या अधिकारकक्षेत आहे. अभयारण्यातून वनोपज आणण्यास मनाई असल्यामुळे साकोली, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील दीड डझन गावातील नागरिक त्यांच्या पत्रावळी तयार करणे, मध गोळा करणे, डिंक व लाख उत्पादन घेणे असे व्यवसाय करू शकत नाहीत. लोकांना त्यांचा अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला परंपरागत व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचा सामना करण्याची वेळ आली आहे. गावांच्या जवळपर्यंत हिंस्त्र प्राण्यांचा शिरकाव झाल्यामुळे शेतात काम करणारेही शेतकरी व मजुरांसाठी असुरक्षित झाले आहे.शेतातील पिकांचे तृणभक्षी प्राणी नुकसान करतात. याबाबत शेतकऱ्यांनी प्रतिबंधासाठी कारवाईचा ससेमिरा सोसावा लागत आहे. पवनी तालुक्यातील ढोरप येथे काही महिन्यापुर्वी घरात बिबट्या शिरला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या अभयारण्याच्या हद्दीतील गावातील शेतकरी व नागरिकांचा व्यवसाय व शेती कसणे अशक्य होत आहे.अद्याप संबंधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या वाढणे चांगली बाब आहे. परंतु, त्यामुळे नागरी वस्त्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखनी तालुक्यातील गावांमध्ये बछड्यांसह वाघिणीची उपस्थिती होती. त्या भागात शेतात जाण्यास बरेच दिवसपर्यंत मजूर तयार नव्हते. हीच बाब साकोली तालुक्यातील उसगाव, चांदोरी या गावांत आहे. (नगर प्रतिनिधी)