शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:55 IST

वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देचुकीचे सर्वेक्षण : नागरिकांमध्ये संताप, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.१९९४ साली आलेल्या महापुराने व गोसी प्रकल्पामुळे नदीकाठावरील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी भंडारापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अर्जुनी, जाख, खोलापूर या गावांचे शासकीय नियमानुसार सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन कारधानजीक गिरोला या गावी करण्यात आले. परंतु अर्जुनी येथील काही लोक जवळच असलेल्या अर्जुनी टोली या ठिकाणी राहत असतात. शासकीय सर्वेक्षण होत असताना त्यांना वगळण्यात आले. या ४५० लोकवस्ती असलेल्या अर्जुनी येथील लोकांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्जुनी टोली या गावाजवळ अर्धा कि.मी. च्या आत गोसी धरणाचे पाणी येते. येथील लोकांच्या ८५ टक्के जमीनी या धरणाच्या पाण्याखाली आल्या आहेत. शासकीय नियमानुसार या गावांचे अर्धा कि.मी. पर्यंत धरणाचे पाणी येत असेल व ८५ टक्के जमिनी धरणाच्या पाण्याखाली असतील त्यांचे १०० टक्के पुनर्वसन केले जाते.गोसी धरणाचे अडवलेले पाणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जंगली हिंस्त्र प्राणी व जलचर प्राणी गावात येत असल्याने नागरिकांत भीतीचे प्रमाण वाढले आहे.अर्जुनी टोली हा अर्जुनी गावाचाच एक भाग असून या गावाची लोकसंख्या ४५० इतकी आहे. हे गाव १०० टक्के पुनर्वसीत असूनसुद्धा शासनाच्या चुकीच्या सर्वेक्षणाने पुनर्वसनापासून वंचित राहिले आहे. या बाबीकडे शासनाने लक्ष दिले नाही तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी टोली येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मंगेश वंजारी, अशोक फुले, चंद्ररेखा गाढवे, वासुदेव तुमसरे, संजय राघोर्ते, सोमेश्वर राघोर्ते, नरेश राघोर्ते, दिनेश गाढवे, कमलाकर गाढवे, ताराचंद सातपैसे, रामचंद्र गाढवे, देवीदास राघोर्ते, गोपीका निकुडे, चेतन राघोर्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.