शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:55 IST

वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देचुकीचे सर्वेक्षण : नागरिकांमध्ये संताप, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.१९९४ साली आलेल्या महापुराने व गोसी प्रकल्पामुळे नदीकाठावरील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी भंडारापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अर्जुनी, जाख, खोलापूर या गावांचे शासकीय नियमानुसार सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन कारधानजीक गिरोला या गावी करण्यात आले. परंतु अर्जुनी येथील काही लोक जवळच असलेल्या अर्जुनी टोली या ठिकाणी राहत असतात. शासकीय सर्वेक्षण होत असताना त्यांना वगळण्यात आले. या ४५० लोकवस्ती असलेल्या अर्जुनी येथील लोकांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्जुनी टोली या गावाजवळ अर्धा कि.मी. च्या आत गोसी धरणाचे पाणी येते. येथील लोकांच्या ८५ टक्के जमीनी या धरणाच्या पाण्याखाली आल्या आहेत. शासकीय नियमानुसार या गावांचे अर्धा कि.मी. पर्यंत धरणाचे पाणी येत असेल व ८५ टक्के जमिनी धरणाच्या पाण्याखाली असतील त्यांचे १०० टक्के पुनर्वसन केले जाते.गोसी धरणाचे अडवलेले पाणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जंगली हिंस्त्र प्राणी व जलचर प्राणी गावात येत असल्याने नागरिकांत भीतीचे प्रमाण वाढले आहे.अर्जुनी टोली हा अर्जुनी गावाचाच एक भाग असून या गावाची लोकसंख्या ४५० इतकी आहे. हे गाव १०० टक्के पुनर्वसीत असूनसुद्धा शासनाच्या चुकीच्या सर्वेक्षणाने पुनर्वसनापासून वंचित राहिले आहे. या बाबीकडे शासनाने लक्ष दिले नाही तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी टोली येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मंगेश वंजारी, अशोक फुले, चंद्ररेखा गाढवे, वासुदेव तुमसरे, संजय राघोर्ते, सोमेश्वर राघोर्ते, नरेश राघोर्ते, दिनेश गाढवे, कमलाकर गाढवे, ताराचंद सातपैसे, रामचंद्र गाढवे, देवीदास राघोर्ते, गोपीका निकुडे, चेतन राघोर्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.