शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:21 IST

नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कार्यप्रणालीमुळे ग्रामीण त्रस्त : जिल्हा परिषद सदस्य रंगारी यांची मागणी

आॅनलाईन लोकमतसाकोली : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामवासींयांनी सहायक वन संरक्षण सदगीर यांच्या वाहनाचा घेराव केला. यात उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी केली आहे.रंगारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थिने रस्त्यावरचा खड्डा बुजवून मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला असून वन विभागाच्या अखत्यारीत गेलेला हा मार्ग पुन्हा केव्हा बंद करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यास बंदी घालण्यात येईल हे प्रश्नाधीन आहे. अभयारण्याचे विस्तारीकरण व वन विभागाच्या कठोर कायद्यामुळे जंगलाल लागून असलेल्या जोर गरीब ग्रामीणांना नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभयारण्य हा रोजगाराभिमुख नसून एक अभिक्षाप ठरत असल्याची संत ग्रामीण व्यक्त करीत आहेत.दीड हजार लोकसंख्या असलेली उमरझरी आतेगाव ही गट ग्रामपंचायत असून नागझिरा अभयारण्याला लगत असलेले हे ग्राम आहे. विस्तार हक्क वहीवाटी नुसार उमरझरी ते आतेगाव हा मार्ग दोन्ही गावांना जोडणारा खूप जूना मार्ग आहे. या मार्गाला लगत शेती असून शेतकºयांना व ग्रामीणांना दोन्ही गावामध्ये ये-जा करीता हा मार्ग सोयीवरठरतो. शासनाच्या निधीतूनया या रस्त्यावर सळीकरण व सी.डी. वर्कची कामे सुद्धा करण्यात आली आहेत. दोन्ही गावांना जोडणारा व शेतशिवारात रात्री बे रात्री जाण्याकरिता हा सोयीचा ठरतो. अचानक वनविभागाने ग्रामीणांना कोणतीही पूर्व सूचना न देता. रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदल्याने व मार्ग बंद केल्याने ग्रामीणामध्ये वन विभागाप्रती रोष निर्माण झाला. ग्रामीणांनी ग्रामसभेचे आयोजन करून सहायक वन संरक्षकसदगीरयांना ग्रामसभेत बोलविण्यात आली.जि.प. सदस्य नेपाल रंगारी उपसरपंच वसंता हटवार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने वनाधिकाऱ्यांची समजूत घालून तोडगा काढण्यात आला व मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आले.जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी माहिती देताना सांगितले की नागझिरा अभयारण्याच्या विस्तारिकरणामुळे जंगलाला लागून असलेल्या पिटेझरी, आमगाव, खैरी, उमरझरी, आंतेगाव, घानोड, जांभळी खांबा, निप्परटोला, सोनेगाव, उसगाव, ४८ गावाला वन विभागाच्या कठोर कायद्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विस्तारीकरणांने रोजगार तर दूर उलट वनाधिकाऱ्यांच्या नवनवीन फतव्यामुळे ग्रामीणावर कायद्याचे उल्लंघन केल्याचे ठपके लावून गुन्हे दाखल करीत असल्याचे चित्र आहे. वन व पर्यटनावर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असले तरी ग्रामीण मात्र या योजनांपासून वंचित आहेत. वनविभाग शासनाच्या रोजगाराभिमुख योजना राबवित नसून ग्रामीणांना वेढीस धरले आहे.ग्रामीणांचे वास्तव्य जंगलाला लागून असल्याने वन्य प्राण्यांमुळे शेतपिकाची नुकसान, हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याची भिती, वन विभागांच्या कायद्याचे पालन करणे व रोजगारांचा प्रश्न असे अनेक प्रश्न ग्रामीणासमोर आहेत. ग्रामस्थ वनविभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सहकार्य करतात. तसेच वनकर्मीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी केले. जर ग्रामीणांच्या वावरण्याने वनविभागाच्या कार्यात विघ्न पडत असेल तर अभयारण्य जंगललगत असलेल्या गावांचे पुनर्वसन करावे, असे निवेदनही रंगारी यांनी केले.सदर रस्ता हा वन विभागाचा संरक्षण मार्ग असून या रस्त्यावर ग्रामीणांना रहदारी करण्याची मनाई केली आहे. पर्यायी रस्ते असून ग्रामीणांनी पर्यायी रस्त्यावरून रहदारी करावी, असे सहायक मुख्य वनसंरक्षक सदगीर यांनी सांगितले.