शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:21 IST

नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कार्यप्रणालीमुळे ग्रामीण त्रस्त : जिल्हा परिषद सदस्य रंगारी यांची मागणी

आॅनलाईन लोकमतसाकोली : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामवासींयांनी सहायक वन संरक्षण सदगीर यांच्या वाहनाचा घेराव केला. यात उमरझरी-आतेगाव गावांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी केली आहे.रंगारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थिने रस्त्यावरचा खड्डा बुजवून मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला असून वन विभागाच्या अखत्यारीत गेलेला हा मार्ग पुन्हा केव्हा बंद करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यास बंदी घालण्यात येईल हे प्रश्नाधीन आहे. अभयारण्याचे विस्तारीकरण व वन विभागाच्या कठोर कायद्यामुळे जंगलाल लागून असलेल्या जोर गरीब ग्रामीणांना नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभयारण्य हा रोजगाराभिमुख नसून एक अभिक्षाप ठरत असल्याची संत ग्रामीण व्यक्त करीत आहेत.दीड हजार लोकसंख्या असलेली उमरझरी आतेगाव ही गट ग्रामपंचायत असून नागझिरा अभयारण्याला लगत असलेले हे ग्राम आहे. विस्तार हक्क वहीवाटी नुसार उमरझरी ते आतेगाव हा मार्ग दोन्ही गावांना जोडणारा खूप जूना मार्ग आहे. या मार्गाला लगत शेती असून शेतकºयांना व ग्रामीणांना दोन्ही गावामध्ये ये-जा करीता हा मार्ग सोयीवरठरतो. शासनाच्या निधीतूनया या रस्त्यावर सळीकरण व सी.डी. वर्कची कामे सुद्धा करण्यात आली आहेत. दोन्ही गावांना जोडणारा व शेतशिवारात रात्री बे रात्री जाण्याकरिता हा सोयीचा ठरतो. अचानक वनविभागाने ग्रामीणांना कोणतीही पूर्व सूचना न देता. रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदल्याने व मार्ग बंद केल्याने ग्रामीणामध्ये वन विभागाप्रती रोष निर्माण झाला. ग्रामीणांनी ग्रामसभेचे आयोजन करून सहायक वन संरक्षकसदगीरयांना ग्रामसभेत बोलविण्यात आली.जि.प. सदस्य नेपाल रंगारी उपसरपंच वसंता हटवार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने वनाधिकाऱ्यांची समजूत घालून तोडगा काढण्यात आला व मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आले.जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी माहिती देताना सांगितले की नागझिरा अभयारण्याच्या विस्तारिकरणामुळे जंगलाला लागून असलेल्या पिटेझरी, आमगाव, खैरी, उमरझरी, आंतेगाव, घानोड, जांभळी खांबा, निप्परटोला, सोनेगाव, उसगाव, ४८ गावाला वन विभागाच्या कठोर कायद्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.विस्तारीकरणांने रोजगार तर दूर उलट वनाधिकाऱ्यांच्या नवनवीन फतव्यामुळे ग्रामीणावर कायद्याचे उल्लंघन केल्याचे ठपके लावून गुन्हे दाखल करीत असल्याचे चित्र आहे. वन व पर्यटनावर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असले तरी ग्रामीण मात्र या योजनांपासून वंचित आहेत. वनविभाग शासनाच्या रोजगाराभिमुख योजना राबवित नसून ग्रामीणांना वेढीस धरले आहे.ग्रामीणांचे वास्तव्य जंगलाला लागून असल्याने वन्य प्राण्यांमुळे शेतपिकाची नुकसान, हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याची भिती, वन विभागांच्या कायद्याचे पालन करणे व रोजगारांचा प्रश्न असे अनेक प्रश्न ग्रामीणासमोर आहेत. ग्रामस्थ वनविभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सहकार्य करतात. तसेच वनकर्मीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी केले. जर ग्रामीणांच्या वावरण्याने वनविभागाच्या कार्यात विघ्न पडत असेल तर अभयारण्य जंगललगत असलेल्या गावांचे पुनर्वसन करावे, असे निवेदनही रंगारी यांनी केले.सदर रस्ता हा वन विभागाचा संरक्षण मार्ग असून या रस्त्यावर ग्रामीणांना रहदारी करण्याची मनाई केली आहे. पर्यायी रस्ते असून ग्रामीणांनी पर्यायी रस्त्यावरून रहदारी करावी, असे सहायक मुख्य वनसंरक्षक सदगीर यांनी सांगितले.