शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमएसच्या परीक्षेला २७६८ विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक ...

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांनाच या परीक्षेला बसता येते. वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येत असते. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपात ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर होणार असून, यात एकूण ९० प्रश्न आणि ९० गुण असतील. शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर होणार असून, यातही ९० प्रश्न आणि ९० गुण राहणार आहेत. एका पेपरसाठी दीड तासाचा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९६ शाळामधून २ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यात सर्वाधिक ५०४ अर्ज पवनी तालुक्यातील आहेत. सर्वात कमी २६५ अर्ज लाखनी तालुक्यातून भरण्यात आले आहेत. त्या खालोखाल तुमसर -४८८ ,साकोली -४४५,भंडारा -४४१, लाखांदूर - ३३५ , मोहाडी -२९० असे एनएमएमएसच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज शाळांनी दाखल केले आहेत. मोहाडी तालुक्यातून सर्वाधिक महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल मोहगाव देवी या शाळेने ३८ अर्ज, भंडारा तालुक्यातील सर्वाधिक अर्ज नानाजी जोशी हायस्कूल शहापूर -७६ ,पवनी तालुक्यातील सर्वाधिक अर्ज गांधी विद्यालय कोंढा -७६ ,तुमसर तालुक्यातील सर्वाधिक अर्ज आदर्श विद्यालय सिहोरा - ५१ ,लाखांदूर तालुक्यातील सर्वाधिक अर्ज जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर -६१, साकोली तालुक्यातील सर्वाधिक अर्ज जिल्हा परिषद हायस्कूल साकोली -८० तर लाखनी तालुक्यातील सर्वाधिक अर्ज समर्थ विद्यालय लाखनी या शाळेने ३२ अर्ज दाखल केले आहेत.

एनएमएमएस परीक्षेच्या आवेदन पत्र भरण्याच्या तारखेत १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रविष्ट होण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.

- संजय डोर्लीकर

शिक्षणाधिकारी(माध्यमिक), जिल्हा परिषद भंडारा