शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

भाडेपट्टीची जागा शासनजमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे.

ठळक मुद्देकारवाईसाठी टाळाटाळ : ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. परंतु, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा तंटामुक्त गाव समिती रेंगेपारचे अध्यक्ष विनायक मुंगमोडे यांनी पत्रपरिषदेत दिला.जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीने सन १९९२ मध्ये शासन निर्णयानुसार रेंगेपार (कोहळी) येथील वृक्षमित्र मंडळाला आठ हेक्टर व रेवताबाई कापगते यांना दोन हेक्टर जागा सुधारित वृक्षपट्टा योजनेसाठी ३० वर्षासाठी कालावधीसाठी नाममात्र भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यासाठी सामाजिक वनविभागाने लाभार्थ्यांसोबत करार करून या जागेवर रोपे लावली आहेत.भाडेपट्टयाने दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करणे, दुसऱ्यांना हस्तांतरण न करणे अशा २७ अटी या करारात आहेत. परंतु, लाभधारकांनी या विभागाला विश्वासात न घेता मातोश्री गोशाळेला नियमबाह्य करारनामा करून कराराचा भंग केला. रेवताबाई कापगते यांनी शेडचे पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना विभागाच्या कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार गावकºयांनी सामाजिक वनीकरण विभागाला केली. त्यावर परिक्षेत्र अधिकारी व जिल्हास्तरावर चौकशी करण्यात आली. यात चौकशी अधिकाºयांनी दोन्ही लाभार्थ्यांनी कराराचा भंग केल्यामुळे ही जागा शासनजमा करण्यात यावी, असा अहवाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना सादर करण्यात आला.परंतु, आठ महिन्यांचा कालावधी होऊनही त्यावर विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या दोन्ही लाभार्थ्यांना दिलेली जागा शासनजमा करण्याची कारवाई झाली नाही तर, सामूहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी शालिक बोरकर, सुनिल बोरकर, तुळशिदास चौधरी, सूर्यभान नंदेश्वर उपस्थित होते.उत्पादन मात्र शून्यया दोन्ही संस्थांना भाडेतत्वावर जागा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्याचवेळी सामाजिक वन विभागाने ग्रामपंचायतीच्या जागेवर रोपे लावली. सध्या ग्रामपंचायतीच्या रोपवनाचे मुल्यांकन अंदाजे तीन कोटी रूपये एवढे आहे. परंतु, लाभार्थ्यांनी त्यांच्या जागेतून ७० हजार रूपयांचे उत्पादन दाखविले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.