शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

भाडेपट्टीची जागा शासनजमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे.

ठळक मुद्देकारवाईसाठी टाळाटाळ : ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. परंतु, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा तंटामुक्त गाव समिती रेंगेपारचे अध्यक्ष विनायक मुंगमोडे यांनी पत्रपरिषदेत दिला.जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीने सन १९९२ मध्ये शासन निर्णयानुसार रेंगेपार (कोहळी) येथील वृक्षमित्र मंडळाला आठ हेक्टर व रेवताबाई कापगते यांना दोन हेक्टर जागा सुधारित वृक्षपट्टा योजनेसाठी ३० वर्षासाठी कालावधीसाठी नाममात्र भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यासाठी सामाजिक वनविभागाने लाभार्थ्यांसोबत करार करून या जागेवर रोपे लावली आहेत.भाडेपट्टयाने दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करणे, दुसऱ्यांना हस्तांतरण न करणे अशा २७ अटी या करारात आहेत. परंतु, लाभधारकांनी या विभागाला विश्वासात न घेता मातोश्री गोशाळेला नियमबाह्य करारनामा करून कराराचा भंग केला. रेवताबाई कापगते यांनी शेडचे पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना विभागाच्या कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार गावकºयांनी सामाजिक वनीकरण विभागाला केली. त्यावर परिक्षेत्र अधिकारी व जिल्हास्तरावर चौकशी करण्यात आली. यात चौकशी अधिकाºयांनी दोन्ही लाभार्थ्यांनी कराराचा भंग केल्यामुळे ही जागा शासनजमा करण्यात यावी, असा अहवाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना सादर करण्यात आला.परंतु, आठ महिन्यांचा कालावधी होऊनही त्यावर विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या दोन्ही लाभार्थ्यांना दिलेली जागा शासनजमा करण्याची कारवाई झाली नाही तर, सामूहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी शालिक बोरकर, सुनिल बोरकर, तुळशिदास चौधरी, सूर्यभान नंदेश्वर उपस्थित होते.उत्पादन मात्र शून्यया दोन्ही संस्थांना भाडेतत्वावर जागा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्याचवेळी सामाजिक वन विभागाने ग्रामपंचायतीच्या जागेवर रोपे लावली. सध्या ग्रामपंचायतीच्या रोपवनाचे मुल्यांकन अंदाजे तीन कोटी रूपये एवढे आहे. परंतु, लाभार्थ्यांनी त्यांच्या जागेतून ७० हजार रूपयांचे उत्पादन दाखविले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.