शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

भाडेपट्टीची जागा शासनजमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:08 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे.

ठळक मुद्देकारवाईसाठी टाळाटाळ : ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. परंतु, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा तंटामुक्त गाव समिती रेंगेपारचे अध्यक्ष विनायक मुंगमोडे यांनी पत्रपरिषदेत दिला.जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीने सन १९९२ मध्ये शासन निर्णयानुसार रेंगेपार (कोहळी) येथील वृक्षमित्र मंडळाला आठ हेक्टर व रेवताबाई कापगते यांना दोन हेक्टर जागा सुधारित वृक्षपट्टा योजनेसाठी ३० वर्षासाठी कालावधीसाठी नाममात्र भाडेतत्वावर देण्यात आली आहे. त्यासाठी सामाजिक वनविभागाने लाभार्थ्यांसोबत करार करून या जागेवर रोपे लावली आहेत.भाडेपट्टयाने दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करणे, दुसऱ्यांना हस्तांतरण न करणे अशा २७ अटी या करारात आहेत. परंतु, लाभधारकांनी या विभागाला विश्वासात न घेता मातोश्री गोशाळेला नियमबाह्य करारनामा करून कराराचा भंग केला. रेवताबाई कापगते यांनी शेडचे पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना विभागाच्या कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार गावकºयांनी सामाजिक वनीकरण विभागाला केली. त्यावर परिक्षेत्र अधिकारी व जिल्हास्तरावर चौकशी करण्यात आली. यात चौकशी अधिकाºयांनी दोन्ही लाभार्थ्यांनी कराराचा भंग केल्यामुळे ही जागा शासनजमा करण्यात यावी, असा अहवाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना सादर करण्यात आला.परंतु, आठ महिन्यांचा कालावधी होऊनही त्यावर विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या दोन्ही लाभार्थ्यांना दिलेली जागा शासनजमा करण्याची कारवाई झाली नाही तर, सामूहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी शालिक बोरकर, सुनिल बोरकर, तुळशिदास चौधरी, सूर्यभान नंदेश्वर उपस्थित होते.उत्पादन मात्र शून्यया दोन्ही संस्थांना भाडेतत्वावर जागा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्याचवेळी सामाजिक वन विभागाने ग्रामपंचायतीच्या जागेवर रोपे लावली. सध्या ग्रामपंचायतीच्या रोपवनाचे मुल्यांकन अंदाजे तीन कोटी रूपये एवढे आहे. परंतु, लाभार्थ्यांनी त्यांच्या जागेतून ७० हजार रूपयांचे उत्पादन दाखविले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.