शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

शिक्षकांच्या गुणवत्तेवर होणार भरती

By admin | Updated: September 21, 2015 00:22 IST

शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो.

आता खासगी शाळा शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला ‘लगाम’ : डी.एड.बी.एड. धारकांमध्ये आशेचा किरणराहुल भुतांगे तुमसर शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. मात्र आता राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरतांना गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय निवड प्रक्रियेद्वारे खाजगी तसेच शासकीय शिक्षक भरती होणार असल्याचे संकेत राज्य परिक्षा परिषदेमार्फत मिळाल्याने, शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला लगाम लागण्याची काही प्रमाणात चिन्हे आहेत.गत पाच-सहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरतीसाठी स्वतंत्र कृती कार्यालयाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी नुकताच एक आदेश पारित केला आहे. त्यासाठी शासनाने १४ आॅगस्ट, २९ जून व ४ आॅगस्ट २०१५ च्या संदर्भ देण्यात आला असुन मुख्यमंत्र्यानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत खाजगी शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा विषय घेण्यात येऊन खाजगी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावी असे निर्देशित करुन शाळेतील पटसंख्या, आरक्षण, इतर निकष मागविले आहेत.त्यामुळे खाजगी शाळेत नव्याने शिक्षक भर्ती करायची असल्यास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संचालकांनी कळविल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद जाहिरातीद्वारे प्रथम उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविणार, प्रश्नपत्रिका तयार करणे व लेखी परिक्षा घेऊन त्यांची पेपर तपासणी पासून तर मुलाखती व निकाल जाहीरही परिक्षा परिषद करणार असल्याने शिक्षक भरर्तीच्या नावावर खाजगी शाळा संस्था चालकांना भोपळा मिळणार आहे.एकंदरीत ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असे चिन्ह दिसत आहे. यामुळे डी.एड. व बी.एड. धारकांना सध्या आशेचा किरण दिसून येत आहेत. यापूर्वी २०१० मध्ये प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत भरती न झाल्याने डी.एड., पदवीधारक संकटात सापडले आहेत. २०१० मध्ये सीईटीद्वारे ही भरती घेण्यात आली होती. परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यानांच भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येत होते. विशेष म्हणजे या परिक्षेच्या निकालाची टक्केवारी एक किंवा २ टक्केच राहत होती. त्यावरुन ही परिक्षा किती कठीण होत असेल हे दिसून येते. ही महाकठीण परिक्षा उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळेल किंवा नाही हे सांगणे अवघडच.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत. जिल्हाभरातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे.- किसन शेंडे,शिक्षणाधिकारी, जि. प. भंडारा