शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या गुणवत्तेवर होणार भरती

By admin | Updated: September 21, 2015 00:22 IST

शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो.

आता खासगी शाळा शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला ‘लगाम’ : डी.एड.बी.एड. धारकांमध्ये आशेचा किरणराहुल भुतांगे तुमसर शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. मात्र आता राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरतांना गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय निवड प्रक्रियेद्वारे खाजगी तसेच शासकीय शिक्षक भरती होणार असल्याचे संकेत राज्य परिक्षा परिषदेमार्फत मिळाल्याने, शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला लगाम लागण्याची काही प्रमाणात चिन्हे आहेत.गत पाच-सहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरतीसाठी स्वतंत्र कृती कार्यालयाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी नुकताच एक आदेश पारित केला आहे. त्यासाठी शासनाने १४ आॅगस्ट, २९ जून व ४ आॅगस्ट २०१५ च्या संदर्भ देण्यात आला असुन मुख्यमंत्र्यानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत खाजगी शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा विषय घेण्यात येऊन खाजगी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावी असे निर्देशित करुन शाळेतील पटसंख्या, आरक्षण, इतर निकष मागविले आहेत.त्यामुळे खाजगी शाळेत नव्याने शिक्षक भर्ती करायची असल्यास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संचालकांनी कळविल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद जाहिरातीद्वारे प्रथम उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविणार, प्रश्नपत्रिका तयार करणे व लेखी परिक्षा घेऊन त्यांची पेपर तपासणी पासून तर मुलाखती व निकाल जाहीरही परिक्षा परिषद करणार असल्याने शिक्षक भरर्तीच्या नावावर खाजगी शाळा संस्था चालकांना भोपळा मिळणार आहे.एकंदरीत ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असे चिन्ह दिसत आहे. यामुळे डी.एड. व बी.एड. धारकांना सध्या आशेचा किरण दिसून येत आहेत. यापूर्वी २०१० मध्ये प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत भरती न झाल्याने डी.एड., पदवीधारक संकटात सापडले आहेत. २०१० मध्ये सीईटीद्वारे ही भरती घेण्यात आली होती. परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यानांच भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येत होते. विशेष म्हणजे या परिक्षेच्या निकालाची टक्केवारी एक किंवा २ टक्केच राहत होती. त्यावरुन ही परिक्षा किती कठीण होत असेल हे दिसून येते. ही महाकठीण परिक्षा उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळेल किंवा नाही हे सांगणे अवघडच.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत. जिल्हाभरातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे.- किसन शेंडे,शिक्षणाधिकारी, जि. प. भंडारा