शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शिक्षकांच्या गुणवत्तेवर होणार भरती

By admin | Updated: September 21, 2015 00:22 IST

शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो.

आता खासगी शाळा शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला ‘लगाम’ : डी.एड.बी.एड. धारकांमध्ये आशेचा किरणराहुल भुतांगे तुमसर शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. मात्र आता राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरतांना गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय निवड प्रक्रियेद्वारे खाजगी तसेच शासकीय शिक्षक भरती होणार असल्याचे संकेत राज्य परिक्षा परिषदेमार्फत मिळाल्याने, शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला लगाम लागण्याची काही प्रमाणात चिन्हे आहेत.गत पाच-सहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरतीसाठी स्वतंत्र कृती कार्यालयाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी नुकताच एक आदेश पारित केला आहे. त्यासाठी शासनाने १४ आॅगस्ट, २९ जून व ४ आॅगस्ट २०१५ च्या संदर्भ देण्यात आला असुन मुख्यमंत्र्यानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत खाजगी शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा विषय घेण्यात येऊन खाजगी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावी असे निर्देशित करुन शाळेतील पटसंख्या, आरक्षण, इतर निकष मागविले आहेत.त्यामुळे खाजगी शाळेत नव्याने शिक्षक भर्ती करायची असल्यास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संचालकांनी कळविल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद जाहिरातीद्वारे प्रथम उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविणार, प्रश्नपत्रिका तयार करणे व लेखी परिक्षा घेऊन त्यांची पेपर तपासणी पासून तर मुलाखती व निकाल जाहीरही परिक्षा परिषद करणार असल्याने शिक्षक भरर्तीच्या नावावर खाजगी शाळा संस्था चालकांना भोपळा मिळणार आहे.एकंदरीत ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असे चिन्ह दिसत आहे. यामुळे डी.एड. व बी.एड. धारकांना सध्या आशेचा किरण दिसून येत आहेत. यापूर्वी २०१० मध्ये प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत भरती न झाल्याने डी.एड., पदवीधारक संकटात सापडले आहेत. २०१० मध्ये सीईटीद्वारे ही भरती घेण्यात आली होती. परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यानांच भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येत होते. विशेष म्हणजे या परिक्षेच्या निकालाची टक्केवारी एक किंवा २ टक्केच राहत होती. त्यावरुन ही परिक्षा किती कठीण होत असेल हे दिसून येते. ही महाकठीण परिक्षा उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळेल किंवा नाही हे सांगणे अवघडच.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत. जिल्हाभरातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे.- किसन शेंडे,शिक्षणाधिकारी, जि. प. भंडारा