शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

विद्यार्थी संख्येवर होणार शिक्षकांची भरती

By admin | Updated: November 4, 2015 00:31 IST

विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

शासनाचा नवा अध्यादेश : अतिरिक्त कामाचा बोझा हटणारभंडारा : विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक पदे निश्चित करण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट कमी केल्याने याचा लाभ होणार आहे. यापूर्वी पहिली ते पाचवीसाठी २०१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होत होता. आता १५१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होतो. याशिवाय तीसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गात २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्या प्रत्येक वर्गात शिक्षक मिळणार आहे. सहावी ते आठवीसाठी पूर्वी ७० पटापर्यंत दोन शिक्षक मंजूर होते. आता तीनही वर्गांना मिळून ३६ पेक्षा अधिक तर माध्यमिक शाळेत ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक पदे मंजूर होणार आहेत. यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक पदांना लाभ होईल. जन्मदर कमी आणि शहरीकरण वाढल्यामुळे ग्रामीण भागातील पटसंख्येमध्ये कमालीची घट आली आहे. वर्ग पहिली ते आठवीपर्यंत पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे पाहिली ते आठवीच्या शाळेला पहिली ते पाचवीची पटसंख्या १५० नसल्याच्या कारणाने व सहावी ते आठवीची पटसंख्या १०० नसल्याने मुख्याध्यापकाचे पद निर्माण होवू शकत नाही. त्यामुळे वर्ग पहिली ते आठवीच्या शाळांसाठी स्वतंत्र मुख्याध्यापक स्वतंत्र पद निर्माण करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)पहिली ते पाचवीसाठी तीन शिक्षक देणे आवश्यक आहे. कारण एक शिक्षक तीन वर्गाला अध्यापन करु शकत नाही. शिक्षण शास्त्रात अशी तरतूद झाल्यास चित्र दिलासादायक होवू शकते.- मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारा.