शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

विद्यार्थी संख्येवर होणार शिक्षकांची भरती

By admin | Updated: November 4, 2015 00:31 IST

विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

शासनाचा नवा अध्यादेश : अतिरिक्त कामाचा बोझा हटणारभंडारा : विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक पदे निश्चित करण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट कमी केल्याने याचा लाभ होणार आहे. यापूर्वी पहिली ते पाचवीसाठी २०१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होत होता. आता १५१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होतो. याशिवाय तीसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गात २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्या प्रत्येक वर्गात शिक्षक मिळणार आहे. सहावी ते आठवीसाठी पूर्वी ७० पटापर्यंत दोन शिक्षक मंजूर होते. आता तीनही वर्गांना मिळून ३६ पेक्षा अधिक तर माध्यमिक शाळेत ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक पदे मंजूर होणार आहेत. यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक पदांना लाभ होईल. जन्मदर कमी आणि शहरीकरण वाढल्यामुळे ग्रामीण भागातील पटसंख्येमध्ये कमालीची घट आली आहे. वर्ग पहिली ते आठवीपर्यंत पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे पाहिली ते आठवीच्या शाळेला पहिली ते पाचवीची पटसंख्या १५० नसल्याच्या कारणाने व सहावी ते आठवीची पटसंख्या १०० नसल्याने मुख्याध्यापकाचे पद निर्माण होवू शकत नाही. त्यामुळे वर्ग पहिली ते आठवीच्या शाळांसाठी स्वतंत्र मुख्याध्यापक स्वतंत्र पद निर्माण करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)पहिली ते पाचवीसाठी तीन शिक्षक देणे आवश्यक आहे. कारण एक शिक्षक तीन वर्गाला अध्यापन करु शकत नाही. शिक्षण शास्त्रात अशी तरतूद झाल्यास चित्र दिलासादायक होवू शकते.- मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारा.