शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

२७९३ करदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान रकमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल केले आहेत. त्यामुळे आता गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यात कृषी सन्मान योजना ही ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून राबवण्यात आली होती. मात्र त्यावेळी योजनेची अंमलबजावणी घाईघाईने करण्यात आल्याने अनेक आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. 

ठळक मुद्दे१५०१ शेतकरी अपात्र : जिल्हा प्रशासनाकडून नोटीस, अपात्र शेतकऱ्यांकडूनही वसुली

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी २०१९  मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यास सुरुवात केली होती. या योजनेच्या प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर २०१८ पासून सुरुवात करण्यात आली.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षभरासाठी सहा हजार रुपये मदत देण्यात येते. मात्र या योजनेची सुरुवातीला अंमलबजावणी करताना घाईगडबड झाल्याने काही अपात्र शेतकरी तसेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने अशा अपात्र करदात्यांकडून ही वसुली करण्याचे प्रत्येक राज्यांना निर्देश दिले. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात आयकर भरणाऱ्या जिल्ह्यातील २७९३ शेतकऱ्यांना तर १५०१ अपात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची वसुली नोटीस पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत अपात्र शेतकऱ्यांकडून ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल केले आहेत. त्यामुळे आता गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यात कृषी सन्मान योजना ही ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून राबवण्यात आली होती. मात्र त्यावेळी योजनेची अंमलबजावणी घाईघाईने करण्यात आल्याने अनेक आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. केंद्र सरकारच्या आदेशानंतर अशा अपात्र करदात्यांकडून वसुली करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाखांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून     येत आहे. 

१५०१ शेतकरी पीएम किसान योजनेतून अपात्र 

पीएम किसान  योजनेमधून पंधराशे एक शेतकरी अपात्र झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देणारी योजना ठरली आहे. मात्र काही कारणांअभावी जिल्ह्यातील १५०१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अशा शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

मी भंडारा तालुक्यातील खरबी येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. मला आतापर्यत पीएम किसान सन्मान योजनेमधून आठ हप्ते नियमितपणे मिळाले असून अगदी कोरोना संकटकाळात मला हे वार्षिक सहा हजाराची रक्कमही आधार देणारी ठरली. माझ्या भावाला पहिल्या वर्षी योजनेचा लाभ मिळालाच नाही मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर आता नियमितपणे त्याच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत. -दीपक गिऱ्हेपुंजे, अल्पभूधारक शेतकरी, खरबी नाका.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना