शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

रेकॉर्ड ब्रेक : भंडारा ४७

By admin | Updated: June 7, 2014 01:22 IST

सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपा समाप्तीनंतर तापमानात

अघोषित संचारबंदी : मागील १२ वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंददेवानंद नंदेश्‍वर भंडारासूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपा समाप्तीनंतर तापमानात थोडीफार घट होईल, अशी अपेक्षा असताना आज, शुक्रवार रोजी पारा ४७ अंशावर  धडकला. मागील १२ वर्षाची रेकार्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाची सर्वाधिक झळ  आज जाणवली. जिल्ह्यात दिवसभर अघोषित  संचारबंदीचे रुप पहावयास मिळाले. उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.  शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक तापमान सन २00२ मध्ये ४३ अंश, २00३ मध्ये ४२ अंश, २00४ मध्ये ४२ अंश, २00५ मध्ये ४६ अंश,  २00६  मध्ये ४२ अंश, २00७ मध्ये ४४.५ अंश, २00८ मध्ये ४२.५ अंश, २00९ मध्ये ४४.५, सन २0१0 मध्ये ४६ अंश,  २0११ मध्ये ४६.५ अंश, सन  २0१२ मध्ये ४६.५ अंश, सन २0१३ मध्ये ४६ अंश तर यावर्षी दि.६  जून रोजी ४७ अंश तापमान नोंदविण्यात आले. मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक  तापमानाची नोंद आज करण्यात आली. उष्णतेच्या बचावासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती, शितपेयांची दुकाने थाटलेली आहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननस आदींची विक्री वाढली  आहे. आज कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पार्‍यात अधीक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे  घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.किमान नोंदीच्या यंत्रात बिघाडउन्हाळ्यात उष्णतेचे तापमान मोजण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचे कार्यालय आहे. परंतु भंडारानजीकच्या कारधा येथे असलेल्या  कार्यालयात गत तीन महिन्यांपासून किमान नोंदणीच्या यंत्रात बिघाड झाल्याने त्याची नोंद केली जात नाही. परिणामी कमाल तापमानाची नोंदीची  माहिती मिळत असली तरी किमान तापमानाची नोंद मिळत नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांना यंत्र दुरूस्तीविषयी कळविण्यात आले. मात्र अद्यापही  किमान नोंदीचे यंत्र हवामान कार्यालयात लावण्यात आले नाही. येथील कार्यालय अधिकार्‍यां विना कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे.