शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी पाठीशी उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली.

ठळक मुद्देभाऊबीजेची अनाेखी भेट : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब

मुखरु बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : संवेनशील मनाचा अधिकारी असला की प्रशासनाच्या रुक्षपणातही माणुसकीचा झरा वाहताे. याचा प्रत्यय भाऊबीजेच्या दिवशी आला. साक्षात जिल्हाधिकारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुबाच्या घरी पाेहाेचले. शेतकरी विधवानी जिल्हाधिकाऱ्यांना ओवाळले. तर ओवाळणी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वताेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्ता पुरुष गमावल्यानंतर काेसळलेल्या संकटाच्या काळात आता भाऊ म्हणून साक्षात जिल्हाधिकारी म्हणून पाठीशी उभे झाले. सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे कुटुंबाची ओढाताण सुरु झाली. कुटुंबाचा गाढा ओढताना त्रेधा उडू लागली. आप्तस्वकीयांच्या आधाराने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा संसराचा गाढा ओढू लागल्या आहे. दिवाळीसारखा सणही या कुटुंबाच्या नशीबी नव्हता. अशातच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम भाऊबीजेच्या दिवशी थेट डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव फुंडे यांच्या घरी पाेहाेचले. जिल्हाधिकारी दारात पाहून सर्व अचंबित झाले. भाऊबीजेला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वंदना सुखदेव फुंडे यांनी ओवाळणी घातली. नियमांच्या अधिन राहून माणुसकीच्या नात्याने जे शक्य हाेईल ते सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांसाेबत चर्चा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे, तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या समस्यांचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर मुरमाडी तुपकर येथील नारायण भाेयर आणि राजेश काेरे यांच्या घरी पाेहाेचले. तेथेही पुष्पा नारायण भाेयर आणि रेवता राजेश काेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाऊबीजेचे औक्षवण केले. संवेदनशील मनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबात भाऊबीज साजरी करुन एक नवा आदर्श निर्माण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शीवराज पडाेळे, समाजकल्याण उपायुक्त आशा कवाडे, तहसीलदार मलीक विराणी, सरपंच ताराचंद निरगुडे, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, राकेश पंधरे आदी उपस्थित हाेते.

तहसीलदारांची भाऊबीजलाखांदूर : प्रशासनाचा प्रमुखच संवेदनशील मनाचा असला की सर्व प्रशासनही संवेदनशील हाेते. लाखांदूरचे तहसीलदार निवृत्ती उईके आणि पर्यवेक्षाधीन प्रदीप सेवाळ यांनी तालुक्यातील खाेलमारा येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुबात जावून भाऊबीज साजरी केली. यावेळी वंदना ईश्वर मदनकर या विधवा बहिनीने त्यांना ओवाळले.