शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षणाकडे शेतकर्‍यांची पाठ

By admin | Updated: May 15, 2014 23:16 IST

पीक उत्पन्नाकडे सहभागी असणार्‍या घटकांमध्ये जमीन हा एक महत्वाचा वैकल्पीक घटक आहे. शेती नियोजनामध्ये जमिनीचा कस उत्तम ठेवण्यास मृद व पाणी परीक्षणावर ..

ूभंडारा : पीक उत्पन्नाकडे सहभागी असणार्‍या घटकांमध्ये जमीन हा एक महत्वाचा वैकल्पीक घटक आहे. शेती नियोजनामध्ये जमिनीचा कस उत्तम ठेवण्यास मृद व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो. यासाठी माती परिक्षण करणे आवश्यक असताना जनजागृती अभावी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविल्याची बाब समोर आली. केवळ शासनाच्या योजनेतून माती परीक्षण करून तोकडी उपाययोजना केली जात असल्याने शेतमालाचे उत्पादन घटले आहे.

भरघोष उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता पिकविणे अत्यंत महत्वाचे आहे. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फूरद व पालास या प्रमुख अन्न घटकांची गरज असून ती बहुतांश रासायनिक खतांद्वारे झालेली आहे. प्रमानशीर खते न दिल्यास पिके चांगली येत नाही. व अनावश्यक खर्च वाढतो. कदाचित मातीचे परिक्षण केल्याने अन्न द्रव्यांची नेमकी गरज पडू शकते. त्यामुळे खताच्या वापरात व खर्चात आर्थिकदृष्ट्या बचत होवून उत्पादनात वाढ करता येवू शकते. मात्र शेतकर्‍यांच्या वैयक्तीक माती परिक्षणाकडे कल नसून शासनाच्या योजनांवर भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यात ७९ शेतकर्‍यांनी सर्व साधारण तर पाच शेतकर्‍यांनी सुक्ष्म मुलद्रव्य तपासणी केली. सर्व साधारण तपासणीसाठी ५0 रूपये तर सुक्ष्म तपासणीसाठी २00 रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरी धजावत असल्याचे दिसून येते. शासनाने २0१0-११ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून माती परिक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या १0 हेक्टरला एक नमूना तपासल्या जातो.

यावर्षी २१८ गावातील ३८३३ नमुने तपासल्या जाणार आहेत. यानंतर जमीन आरोग्य पत्रिका तयार करून शेतकर्‍यांना उपाय योजना सांगितल्या जाते. परंतु या योजनेवर शेतकर्‍यांची मदार असल्याचे दिसत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय जमीन आरोग्य सुपिकता व्यवस्थापन कार्यक्रम राबवून प्रति हेक्टरी ५00 रूपये सवलतीने सुक्ष्म द्रव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र माती परिक्षणाकडे पाठ फिरविल्याने जमिनीची कस सुधारत नसल्याने शेतमालाचे उत्पादन घटत आहे.

(नगर प्रतिनिधी)