शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विरलीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:42 IST

येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : महिन्याभरापासून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा, ग्रामप्रशासन टिल्लूपंप धारकांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज.) : येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भर उन्हा-तान्हात पायपीट करावी लागत आहे.विरलीकरांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना २०१६ पासून कार्यान्वीत करण्यात आली. मात्र या महत्वाकांक्षी योजनेला सध्या ग्रहन लागले असून ही योजना गावकºयांची लहान गावकºयांना दिवसातून केवळ एकदाच अपूरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी गावकºयांना आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषत: पशुपालकांना जनावरांची तहान भागविण्यासाठी गावालगतच्या शेतातून बैलबंडी अथवा ढकल गाडीने पाणी आणावे लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे ४५० खाजगी नळजोडण्या असून पाच सार्वजनिक नळ कोंडाळे आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ३५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. मात्र एवढ्या पाणीपुरवठ्याच्या सोयी असूनही सदोष पाणीपुरवठा प्रणाली, टिल्लूपंप धारकांना स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे अभय आणि पाण्याच्या अपव्ययांमुळे विरलीकरांना पुरेसा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाली आहे.विरली ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात असून त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभियान मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्राम प्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकºयांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुस्की ओढवली.गावात सध्यास्थितीत शंभराहून अधिक टिल्लूपंपधारक कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र यासंबंधी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असता तुमच्या नळाला पाणी येत नसेल तर नळजोडणी बंद करून घ्या, अशी तक्रारकर्त्यांची बोळवण करून टिल्लूपंप धारकांना पाठीशी घातले जात आहे. सध्या काही लोकांचे घराचे बांधकामे सुरू असून पिण्याची पाणी टिल्लुपंपाने खेचून त्याचा उपयोग बांधकामासाठी केला जात आहे.पाच लाखांच्या योजनेने ८ वर्षे तहान भागविलीयापूर्वी सन २००८ ते २०१६ पर्यंत येथील शिवकालीन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीमधून सुरळीत पाणीपुरवठा होवून गावकºयांची तृष्णा शमविली जात होती. मात्र वैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन दोन वर्ष लोटत नाही तोच या योजनेला वारंवार काहींना काही ग्रहण लागत असून ही पाणीपुरवठा योजना गावकºयांची तहान भागविण्यास असमर्थ ठरली आहे.गावकºयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी गावातील नादुरूस्त हातपंपाच्या दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यातून पशुपालकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच ग्रामपंचायत विरली