शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरलीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:42 IST

येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : महिन्याभरापासून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा, ग्रामप्रशासन टिल्लूपंप धारकांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज.) : येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भर उन्हा-तान्हात पायपीट करावी लागत आहे.विरलीकरांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना २०१६ पासून कार्यान्वीत करण्यात आली. मात्र या महत्वाकांक्षी योजनेला सध्या ग्रहन लागले असून ही योजना गावकºयांची लहान गावकºयांना दिवसातून केवळ एकदाच अपूरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी गावकºयांना आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषत: पशुपालकांना जनावरांची तहान भागविण्यासाठी गावालगतच्या शेतातून बैलबंडी अथवा ढकल गाडीने पाणी आणावे लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे ४५० खाजगी नळजोडण्या असून पाच सार्वजनिक नळ कोंडाळे आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ३५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. मात्र एवढ्या पाणीपुरवठ्याच्या सोयी असूनही सदोष पाणीपुरवठा प्रणाली, टिल्लूपंप धारकांना स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे अभय आणि पाण्याच्या अपव्ययांमुळे विरलीकरांना पुरेसा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाली आहे.विरली ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात असून त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभियान मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्राम प्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकºयांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुस्की ओढवली.गावात सध्यास्थितीत शंभराहून अधिक टिल्लूपंपधारक कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र यासंबंधी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असता तुमच्या नळाला पाणी येत नसेल तर नळजोडणी बंद करून घ्या, अशी तक्रारकर्त्यांची बोळवण करून टिल्लूपंप धारकांना पाठीशी घातले जात आहे. सध्या काही लोकांचे घराचे बांधकामे सुरू असून पिण्याची पाणी टिल्लुपंपाने खेचून त्याचा उपयोग बांधकामासाठी केला जात आहे.पाच लाखांच्या योजनेने ८ वर्षे तहान भागविलीयापूर्वी सन २००८ ते २०१६ पर्यंत येथील शिवकालीन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीमधून सुरळीत पाणीपुरवठा होवून गावकºयांची तृष्णा शमविली जात होती. मात्र वैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन दोन वर्ष लोटत नाही तोच या योजनेला वारंवार काहींना काही ग्रहण लागत असून ही पाणीपुरवठा योजना गावकºयांची तहान भागविण्यास असमर्थ ठरली आहे.गावकºयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी गावातील नादुरूस्त हातपंपाच्या दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यातून पशुपालकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच ग्रामपंचायत विरली