शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विरलीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:42 IST

येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : महिन्याभरापासून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा, ग्रामप्रशासन टिल्लूपंप धारकांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज.) : येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भर उन्हा-तान्हात पायपीट करावी लागत आहे.विरलीकरांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना २०१६ पासून कार्यान्वीत करण्यात आली. मात्र या महत्वाकांक्षी योजनेला सध्या ग्रहन लागले असून ही योजना गावकºयांची लहान गावकºयांना दिवसातून केवळ एकदाच अपूरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी गावकºयांना आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषत: पशुपालकांना जनावरांची तहान भागविण्यासाठी गावालगतच्या शेतातून बैलबंडी अथवा ढकल गाडीने पाणी आणावे लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे ४५० खाजगी नळजोडण्या असून पाच सार्वजनिक नळ कोंडाळे आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ३५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. मात्र एवढ्या पाणीपुरवठ्याच्या सोयी असूनही सदोष पाणीपुरवठा प्रणाली, टिल्लूपंप धारकांना स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे अभय आणि पाण्याच्या अपव्ययांमुळे विरलीकरांना पुरेसा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाली आहे.विरली ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात असून त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभियान मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्राम प्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकºयांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुस्की ओढवली.गावात सध्यास्थितीत शंभराहून अधिक टिल्लूपंपधारक कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र यासंबंधी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असता तुमच्या नळाला पाणी येत नसेल तर नळजोडणी बंद करून घ्या, अशी तक्रारकर्त्यांची बोळवण करून टिल्लूपंप धारकांना पाठीशी घातले जात आहे. सध्या काही लोकांचे घराचे बांधकामे सुरू असून पिण्याची पाणी टिल्लुपंपाने खेचून त्याचा उपयोग बांधकामासाठी केला जात आहे.पाच लाखांच्या योजनेने ८ वर्षे तहान भागविलीयापूर्वी सन २००८ ते २०१६ पर्यंत येथील शिवकालीन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीमधून सुरळीत पाणीपुरवठा होवून गावकºयांची तृष्णा शमविली जात होती. मात्र वैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन दोन वर्ष लोटत नाही तोच या योजनेला वारंवार काहींना काही ग्रहण लागत असून ही पाणीपुरवठा योजना गावकºयांची तहान भागविण्यास असमर्थ ठरली आहे.गावकºयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी गावातील नादुरूस्त हातपंपाच्या दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यातून पशुपालकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच ग्रामपंचायत विरली