लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरन्या बाजारात आल्या असून या वर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे.पवनी वनपरिक्षेत्रात फक्त सिरसाळा गावाजवळच्या जंगलात रानमेवा ठरलेल्या खिरन्यांची झाडे आहेत. ही झाडे जाड, गर्द, हिरव्या पानांनी झाकलेली असल्यामुळे या झाडाखाली मोठी थंडी असते. यामुळे वन्यप्राणीही या झाडाखाली उन्हाळ्यात विसावा घेतात. या झाडांना एप्रिल ते जून महिन्यात पिवळ्या रंगाची तांबोळी फळे येतात. ही फळे गोड, शितल, बलवर्धक असल्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना या खिरन्या आवडतात.पवनी तालुक्यात फक्त याच जंगलात खिरन्यांची झाडे ाअहेत.या खिरन्यांच्या झाडाचा लिलाव वनविभागातर्फे होतो.या जंगलातून दररोज २०० किलो खिरन्या निघत आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या हंगामात यावर्षी ३ लक्ष रुपयांच्या खिरन्या विक्री होण्याची अपेक्षा आहे. या खिरन्या दररोज बाजारात येत आहेत.तसेच जवाहर गेट परिसरात खिरन्यांची विक्री होत असून मोठ्या संख्येने पर्यटक या खिरन्यांचा आस्वाद घेत आहेत.
रानमेवा खिरन्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:59 IST
सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरन्या बाजारात आल्या असून या वर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे.
रानमेवा खिरन्या बाजारात
ठळक मुद्देआल्हाददायक फळ : रानमेवा झाला दुरापास्त