शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 भंडारा जिल्ह्यातील माेहरणाचा रँचो; पंक्चर फ्री रसायन तयार करून बेरोजगारीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 16:00 IST

Bhandara News मोहरणा येथील एका अभियंत्याने पंक्चर फ्री रसायन तयार केले. पंक्चरची समस्याच सोडविली नाही तर आपल्या गावातच अर्थार्जनाचा मार्गही शोधला. भागवत राऊत असे या रँचोचे नाव आहे.

ठळक मुद्दे खासगी कंपनीतील नोकरी सोडून गावातच संशोधन

दयाल भोवते 

लोकमत न्यूज नेटवर्क  

 भंडारा  : दुचाकीचा ट्युबलेस टायर पंचर झाला तरी काही अंतरावर चालतो. पण पंचर दुचाकीवर दोघे गाडीने जाऊ शकत नाही. समजा गेले तरी टायरला छोटे छोटे अनेक पंक्चर होतील. अल्पावधितच टायर बदलवावा लागेल. या समस्येला कंटाळून तालुक्यातील मोहरणा येथील एका अभियंत्याने पंक्चर फ्री रसायन तयार केले. पंक्चरची समस्याच सोडविली नाही तर आपल्या गावातच अर्थार्जनाचा मार्गही शोधला. भागवत राऊत असे या रँचोचे नाव असून नवनवीन रसायन तयार करण्यासाठी संशोधन करीत आहे.

सध्याचे युग हे यांत्रिकीकरणाचे युग आहे. या युगातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असल्याचे दिसून येते. कोणी रोजगारासाठी, कोणी नोकरीसाठी, तर कोणी जगण्यासाठी धडपडतानाचे दिसतात. भागवतचे प्राथमिक शिक्षण मोहरणा या गावी झाले. १२ वीपर्यंतचे शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथील स्वामी विवेकानंद विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकी केली. ग्रामीण भागातील एका तरूणाने अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण केले. जिज्ञासू व संशोधक वृत्ती असणाऱ्या भागवतने महाविद्यालयीन जीवनात ध्वनीच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याचा अफलातून प्रयोग केला हाेता.

खासगी कंपनीत काही काळ नोकरी केली. मात्र त्याचे मन महानगरात रमत नव्हते. त्यातच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. नोकरी सोडून त्याने थेट मोहरणा गाठले. सुरूवातीला गावातील लोकांनी त्याला वेड्यात काढले. पण तो डगमगला नाही. आपले संशोधन सुरू ठेवले. लॉकडाऊन दरम्यान त्याने बाहेरुन विविध कच्ची सामुग्री बोलवुन पंक्चर फ्री रसायन तयार केले. त्याच्या संशोधनाने ग्रामीण भागातील दुचाकी पंक्चरची समस्या काही अंशी सुटली.

रसायन असे करते काम

ट्यूब लेस टायरच्या गोट मधून हवा लीक होणे, दुरुस्त केलेल्या पंचरच्या दोरीतून हवा लिक होणे, छोट्या-छोट्या छिद्रामधून हवा जाणे, हवा कुठून जाते ते माहितीही हाेत नाही. यामुळेच दुचाकीधारकाला विविध समस्यांचा समाना करावा लागतो. पंक्चर झाल्यानंतर भागवतने तयार केले रसायन टायरमध्ये टाकल्यानंतर पंक्चर असेल तर तो दुरुस्त होतो. टायरला असणार छोट्या छिद्रातून रसायन बाहेर येऊन छिद्र बुजविण्याचे काम करते. टायरमध्ये सुरुवातीपासूनच रसायन टाकून ठेवले तर टायर पंचर होत नाही. परिणामी टायरची आयुमर्यादादेखील वाढते, रसायन तब्बल तीन वर्षापर्यंत टायरला सुरक्षा देत असल्याची माहिती अभियंता भागवत राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :scienceविज्ञान