शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यात भात रोवणी केवळ चार टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:55 IST

हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत.

ठळक मुद्देअपुरा पाऊस : सात हजार २७५ हेक्टरवर रोवणी

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. रोवणी लांबल्यास याचा परिणाम भात उत्पादनावर होणार हे निश्चीतच.भंडारा जिल्ह्यात दोन लाख ३ हजार ६१६ हेक्टरवर खरीप हंगामात नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पºहे टाकण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला. आद्रा नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. परंतु तोही पुरेसा नाही. १ जून ते ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३५३ मिमी पाऊस अपेक्षीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३९.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात तर भंडारा, पवनी तालुक्यात पाऊसच कोसळला नव्हता. परिणामी शेतीची सर्व कामे खोळंबली. गत आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र हा ही पाऊस भात रोवणीसाठी योग्य जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भात रोवणीचे कामे खोळंबली आहे.भंडारा जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टरपैकी केवळ ७ हजार २७५ हेक्टरवरच भाताची रोवणी झाली आहे. केवळ ३.८७ टक्के रोवणी झाल्याचा नजर अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात तुरीची पेरणी ११ हजार २२ हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत ९१६ हेक्टरवरच पेरणी आटोपली होती.जिल्ह्यात अद्यापही कोणत्याही नदी-नाल्याला पुर गेला नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. शेतात चिखलनी योग्य पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. रोवणी लांबल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.लाखांदूरमध्ये सर्वाधिक रोवणीभंडारा जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी लाखांदूर तालुक्यात ८.८८ टक्के झाली आहे. २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार ६५१ हेक्टरवर भाताची रोवणी आटोपली आहे. सर्वात कमी रोवणी भंडारा तालुक्यात झाली असून येथे १.६१ टक्केच रोवणी झाली आहे. भंडारा तालुक्यातील २५ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून केवळ ४१५ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.२५०० हेक्टरवर तूरभंडारा जिल्ह्यात भातासोबतच तुरीची लागवड केली जाते. ७०६९ हेक्टरवर तुर लागवडीचे नियोजन असून आतापर्यंत २५७९ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३६.४८ टक्के क्षेत्रात लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड तुमसर तालुक्यातील ७४ टक्के झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :agricultureशेती