शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

जिल्ह्यात भात रोवणी केवळ चार टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:55 IST

हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत.

ठळक मुद्देअपुरा पाऊस : सात हजार २७५ हेक्टरवर रोवणी

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. रोवणी लांबल्यास याचा परिणाम भात उत्पादनावर होणार हे निश्चीतच.भंडारा जिल्ह्यात दोन लाख ३ हजार ६१६ हेक्टरवर खरीप हंगामात नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पºहे टाकण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला. आद्रा नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. परंतु तोही पुरेसा नाही. १ जून ते ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३५३ मिमी पाऊस अपेक्षीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३९.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात तर भंडारा, पवनी तालुक्यात पाऊसच कोसळला नव्हता. परिणामी शेतीची सर्व कामे खोळंबली. गत आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र हा ही पाऊस भात रोवणीसाठी योग्य जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भात रोवणीचे कामे खोळंबली आहे.भंडारा जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टरपैकी केवळ ७ हजार २७५ हेक्टरवरच भाताची रोवणी झाली आहे. केवळ ३.८७ टक्के रोवणी झाल्याचा नजर अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात तुरीची पेरणी ११ हजार २२ हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत ९१६ हेक्टरवरच पेरणी आटोपली होती.जिल्ह्यात अद्यापही कोणत्याही नदी-नाल्याला पुर गेला नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. शेतात चिखलनी योग्य पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. रोवणी लांबल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.लाखांदूरमध्ये सर्वाधिक रोवणीभंडारा जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी लाखांदूर तालुक्यात ८.८८ टक्के झाली आहे. २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार ६५१ हेक्टरवर भाताची रोवणी आटोपली आहे. सर्वात कमी रोवणी भंडारा तालुक्यात झाली असून येथे १.६१ टक्केच रोवणी झाली आहे. भंडारा तालुक्यातील २५ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून केवळ ४१५ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.२५०० हेक्टरवर तूरभंडारा जिल्ह्यात भातासोबतच तुरीची लागवड केली जाते. ७०६९ हेक्टरवर तुर लागवडीचे नियोजन असून आतापर्यंत २५७९ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३६.४८ टक्के क्षेत्रात लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड तुमसर तालुक्यातील ७४ टक्के झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :agricultureशेती