शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लाखांदुरात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: October 19, 2016 00:41 IST

पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, ..

तहसीलदारांना निवेदन : पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ -रमेश डोंगरे यांचा आरोपलाखांदूर : पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या शुल्कामध्ये सवलत मिळाली पाहिजे, विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तारेचे कुंपण मिळाले पाहिजे, आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी लाखांदूर तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून लाखांदूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसील कार्यालय परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रमिला कुटे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडाऱ्याचे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, नगरसेवक रामचंद्र राऊत, शफी लद्धानी, भुमेश्वर महावाडे, मनोहर राऊत, डॉ.अजय तुमसर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, मंगला बागमारे, प्रणाली ठाकरे, शुध्दमता नंदागवळी, नीलिमा टेंभुर्णे, ताराचंद मातेरे, धम्मदीप रंगारी, गोपाळ मेंढे, धनु कार, भोजराव राऊत, गजानन नाकतोडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणाले, नैसर्गिक आपत्तीना नेहमी तोंड देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. अशाही परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने पीक कर्जातून पीक विम्याची रक्कम कपात केल्यामुळे शेतकरी उघड्यावर पडला आहे. पिकाची नासाडी होऊनही पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. असे असताना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ का होत आहे, असा प्रश्नही डोंगरे यांनी उपस्थित केला. यावेळी प्रमिला कुटे म्हणाल्या शेतकरी शेतीमध्ये नुकसान सहन करीत आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, आदिवासींचे वनहक्काचे दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पडून आहेत. अशीच स्थिती राहिली तर त्यांना न्याय कसे मिळेल, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी, थकीत वीज जोडणी करून २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)