शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:29 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रविवारला दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे.

ठळक मुद्देभाजप प्रवेशाची चर्चा : आणखी काही नेते भाजपच्या गळाला लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/तुमसर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रविवारला दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे. नाराज पटलेंना भाजपने आपल्याकडे खेचल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. परंतु याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.याबाबत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विचारले असता पटलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा ऐकली असल्याचे सांगितले. अधिकृतरित्या येत्या दोन दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सूत्राने दिली आहे.पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पटले हे नाराज होते. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ते संपर्कात होते. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक घेतली होती. त्या बैठकीलाही जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे उपस्थित नव्हते.राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे असून तुमसरचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे तुमसरचे असून पटले भाजपसोबत आल्यास त्यांचा भाजपला लाभ होऊ शकतो, असा सूर भाजपमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या एका नेत्याने पटले यांच्याशी संपर्क साधला. भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. पटले हे सोमवारला दिवसभर तुमसरात होते. परंतु त्यांनी कुणाचाही फोन रिसिव्ह केला नाही. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.राजेंद्र पटले हे सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता पदाची २२ वर्षे नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर तुमसर विधानसभेची भाजपने उमेदवारी नाकारली.किसान गर्जना संघटना स्थापन करून २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली. त्यात पराभूत झाल्यानंतर त्यानंतर सेनेने त्यांना जिल्हाप्रमुख केले. शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. पोवार समाजाची मते खेचून घेण्याकरिता भाजपने त्यांना आपल्याकडे नेल्याची चर्चा सुरू आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपच्या गळाला पुन्हा काही पक्षाचे नेते लागण्याची शक्यता आहे.