शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

न्यायासाठी राजेगाव वासीयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:07 IST

तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देअशोक लेलँड व्यवस्थापनाची अरेरावी : २६ एकरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चेकरी व व्यवस्थापनामध्ये वाद समोपचाराने न मिटविता व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने अरेरावी केल्यामुळे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुपारी शेकडो राजेगाववासी व परिसरातील नागरिक येथील जलाराम मंगल कार्यालयासमोर एकत्र आले. तिथून घोषणाबाजी करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. सभेला सरपंच अनिता शेंडे, नरेश शेंडे, कुंजन शेंडे, मनोहर सार्वे, शशिकांत भोयर, दिनेश वासनिक, भानुदास सार्वे, तुळशीराम गेडाम, दिलीप मोटघरे, इंजि. त्र्यंबक घरडे, संजीव भांबोरे, शालीक गंथाडे, शारदा गथांडे, तुकाराम झलके आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अशोक लेलँड कंपनीने राजेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेली जमीन अतिक्रमणाच्या माध्यमातून हडप केली आहे, असा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट आहे.या जमिनीसंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशोक लेलँडने २६ एकर जमीन ही एमआयडीसीची नसल्याची यापुर्वीच स्पष्ट केले आहे. अतिक्रमणाच्या मुद्यावर राजेगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करुन तोडगा काढावा, यासाठी अनेकदा सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र कारखाना व्यवस्थापनाचा कोणताही अधिकारी सभेला उपस्थित राहत नाही. उलट अरेरावीची उत्तरे दिले जात आहे.याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी करण्यात आली. मात्र न्याय मिळत नसल्याने राजेगाव वासीयांनी बुधवारला धडक मोर्चा काढला. सायंकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.बोरडकरविरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवाअतिक्रमणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच अनिता शेंडे यांनी कारखाना व्यवस्थापकांना ग्रामपंचायत येथे येण्याचे आमंत्रण दिले. मात्र व्यवस्थापकाने जातीवाचक शब्द बोलून अपमानीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. मोर्चेकऱ्यांत राजेगाव एमआयडी परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले.आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये राजेगाववासीयांचे बारा-तेरा प्रतिनिधी, कारखान्याकडून चार-पाच प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या पाच-सहा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झालेली आहे. सरपंचांची जातच माहित नसून त्यांना शिवीगाळ केली हे म्हणणे तथ्यहिन आहे.-अरविंद बोरडकर, व्यवस्थापक, अशोक लेलँण्ड कारखाना, गडेगाव.

टॅग्स :Morchaमोर्चा