शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांची लोकचळवळ उभारा

By admin | Updated: April 26, 2017 00:36 IST

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. झपाटयाने बदलत असलेल्या इंटरनेटच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे पडता कामा नये.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : अधिकाऱ्यांनी शाळांना भेट द्यावी, विद्यार्थी-अधिकारी संवाद व्हावा भंडारा : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. झपाटयाने बदलत असलेल्या इंटरनेटच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे पडता कामा नये. ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भरारी घेऊ शकतो, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा किंवा शासनाने पुढे येऊन चालणार नाही तर नव्या युगासोबत आपला पाल्य प्रगती करावा म्हणून डिजीटल क्रांतीसाठी पालक सहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार नाना पटोले यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कायर्कारी अधिकारी शदर अहिरे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, पालकांच्या सहभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजीटल लोकचळवळ उभी राहणार आहे याचा फायदा नव्या पिढीला सक्षम व विकसित करण्यासाठी होणार आहे. डिजीटल शाळांसाठी केंद्र व राज्य शासन निधी देते. मात्र यासाठी पालकांनी सुध्दा सहभाग घेणे गरजेचे आहे. पाल्याला डिजीटल शिक्षण मिळावे ही ईच्छा पालकांना असायला हवी. त्याशिवाय डिजीटल शाळा संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही. पालकांच्या सहभागातून डिजीटल शाळांची लोकचळवळ उभी रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना वेगळया प्रोफेशनची माहिती देणे आवश्यक आहे. मुलांचा कल कुणीकडे आहे याची माहिती करुन घेतल्यास विद्यार्थी घडविण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय दौऱ्यादरम्यान शाळांना भेटी द्याव्यात व मुलाशी संवाद साधावा जेणेकरुन मुलांना प्रोत्साहन मिळेल. तसेच शासकीय अधिकारी व शासन याबाबत त्यांना जवळून जाणून घेता येईल, असे त्यांनी नमूद केले. मामा तलावाची योग्य खोलीकरण करण्यात यावे तसेच गाळ काढण्यात यावा. यामुळे मामा तलावात पाणी मोठया प्रमाणात साठवणूक होईल. मामा तलावात मत्स्य व्यावसाय करण्याला मोठया प्रमाणात वाव असून यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्हयात सरासरी १२०० मि.ली. पाऊस पडत असून तरीही पाणी टंचाई का निर्माण होते यावर विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवारची कामे करतांना वन तलावाला प्राधान्य देण्यात यावे. जिल्हयात ५५ वन तलाव असून या तलावाचे खोलीकरण केल्यास पाणी साठून पाणी पातळीत वाढ होऊ शकते. याचबरोबर पाणलोट विकास कार्यक्रम मोठया प्रमाणात हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून आदर्श पुनर्वसन व पुनर्वसन झालेल्या गावात सोईसुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात यावे. बावनथडी प्रकल्पासाठी केंद्र सरकाने मोठया प्रमाणात निधी दिला आहे. ती कामे सुध्दा तातडिने पुर्ण होणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)