शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

दारुबंदीसाठी चळवळ उभारा

By admin | Updated: September 30, 2015 00:50 IST

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अवघ्या सहा महिन्यात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने खाली आला.

सालेभाटा येथे मेळावा : पारोमिता गोस्वामी यांचे आवाहनभंडारा : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अवघ्या सहा महिन्यात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने खाली आला. अनेकांचे राहणीमान उंचावले. अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले. त्यामुळे दारुचे दुष्परिणाम सांगण्यासाठी दारुबंदीसाठी चळवळ उभारा, असे आवाहन श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.सालेभाटा येथे दारुबंदी मेळाव्यासाठी आले असता त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यात झालेली दारुबंदी ही वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी तिथे दारु पिण्यासाठी अनेकांकडे परवाने आहेत. त्यामुळे दारु समूळ नष्ट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे परवाने दिले गेले नाही. २००१ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नव्हते. २०१० मध्ये चिमूर ते नागपूर अशी महिलांची पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकार जागे झाले नाही. त्यामुळे २०१३ मध्ये महिलांनी मुंडण आंदोलन केले. याची राज्य शासनाने दखल घेऊन देवतळे समिती गठित केली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर दारुबंदी करण्याचे अभिवचन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. सत्ता आल्यानंतर त्यांनी शब्द पाळला आणि दारुबंदीच्या प्रयत्नाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा दारुमुक्ती आंदोलन समितीची घोषणा केली. या समितीत नरेश बोपचे, राजेंद्र फुलबांधे, अनिल मेंढे, माधुरी नखाते, हरीष तलमले, सभापती शुभांगी रहांगडाले, माजी सभापती वीणा झंझाड, माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. वसंत एंचिलवार, रवींद्र खोब्रागडे, अजय तुमसरे यांच्यासह महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)