शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हजेरी

By admin | Updated: September 15, 2015 00:29 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.

धो-धो बरसला : धानपिकाला मिळाली नवसंजीवनीभंडारा : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. साकोली व लाखनी तालुक्यात अर्धा तास पाऊस झाला. भंडाराजवळील शिंगोरी ते लाखनी या दरम्यान धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.लाखांदुरात जोरदार पाऊसलाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांपासून पावसाअभावी धानपिके करपत होते. आज सोमवारला सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव दिसले. मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील धानपिक करपू लागले होते. इटियाडोह धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने मुबलक पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नाले व खड्यातील पाणी वापरून शेतकऱ्यांनी धानपीक जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयोग सुरु केला होता. हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी हिंमत सोडली असताना सायंकाळच्या सुमारास विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात कोरडवाहू शेती सोबतच सिंचनाखालील धान पिकांना नवी संजीवनी मिळाली.साकोलीत अर्धा तास पाऊससाकोली तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान वीजा कडाडल्या. अर्धा तासानंतर पाऊस बंद झाला. उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. (लोकमत चमू)उकाड्याने नागरिक हैराणमासळ परिसरात पावसाच्या दीर्घकालीन विश्रांतीने वातावरणात उकाडा वाढला आहे. १५ ते २० दिवसांपासून परिसरात पाऊस बेपता झाला आहे. वातावरण बदलामुळे ऊन्ह तापत असून उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीसुद्धा १० ते ११ वाजेपर्यंत उकाडा कायम राहत असल्याने शाळकरी मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असह्य उकाड्यामुळे ताप, सर्दी, दुखणे, उलट्या अशा आजरांनी सुद्धा लोकांना ग्रासले आहे. त्यामुळे विशेषत: शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर फरक पडला आहे. वातावरणात बदल झाल्याने असह्य उकाड्याने अक्षरश: घामाच्या धारा वाहत असून नागरिक मात्र हैराण झाले आहेत.(वार्ताहर)