शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हजेरी

By admin | Updated: September 15, 2015 00:29 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.

धो-धो बरसला : धानपिकाला मिळाली नवसंजीवनीभंडारा : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. साकोली व लाखनी तालुक्यात अर्धा तास पाऊस झाला. भंडाराजवळील शिंगोरी ते लाखनी या दरम्यान धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.लाखांदुरात जोरदार पाऊसलाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांपासून पावसाअभावी धानपिके करपत होते. आज सोमवारला सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव दिसले. मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील धानपिक करपू लागले होते. इटियाडोह धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने मुबलक पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नाले व खड्यातील पाणी वापरून शेतकऱ्यांनी धानपीक जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयोग सुरु केला होता. हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी हिंमत सोडली असताना सायंकाळच्या सुमारास विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात कोरडवाहू शेती सोबतच सिंचनाखालील धान पिकांना नवी संजीवनी मिळाली.साकोलीत अर्धा तास पाऊससाकोली तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान वीजा कडाडल्या. अर्धा तासानंतर पाऊस बंद झाला. उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. (लोकमत चमू)उकाड्याने नागरिक हैराणमासळ परिसरात पावसाच्या दीर्घकालीन विश्रांतीने वातावरणात उकाडा वाढला आहे. १५ ते २० दिवसांपासून परिसरात पाऊस बेपता झाला आहे. वातावरण बदलामुळे ऊन्ह तापत असून उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीसुद्धा १० ते ११ वाजेपर्यंत उकाडा कायम राहत असल्याने शाळकरी मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असह्य उकाड्यामुळे ताप, सर्दी, दुखणे, उलट्या अशा आजरांनी सुद्धा लोकांना ग्रासले आहे. त्यामुळे विशेषत: शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर फरक पडला आहे. वातावरणात बदल झाल्याने असह्य उकाड्याने अक्षरश: घामाच्या धारा वाहत असून नागरिक मात्र हैराण झाले आहेत.(वार्ताहर)