शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पावसाची हजेरी

By admin | Updated: September 15, 2015 00:29 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.

धो-धो बरसला : धानपिकाला मिळाली नवसंजीवनीभंडारा : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. साकोली व लाखनी तालुक्यात अर्धा तास पाऊस झाला. भंडाराजवळील शिंगोरी ते लाखनी या दरम्यान धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.लाखांदुरात जोरदार पाऊसलाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांपासून पावसाअभावी धानपिके करपत होते. आज सोमवारला सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव दिसले. मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील धानपिक करपू लागले होते. इटियाडोह धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने मुबलक पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नाले व खड्यातील पाणी वापरून शेतकऱ्यांनी धानपीक जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयोग सुरु केला होता. हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी हिंमत सोडली असताना सायंकाळच्या सुमारास विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात कोरडवाहू शेती सोबतच सिंचनाखालील धान पिकांना नवी संजीवनी मिळाली.साकोलीत अर्धा तास पाऊससाकोली तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान वीजा कडाडल्या. अर्धा तासानंतर पाऊस बंद झाला. उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. (लोकमत चमू)उकाड्याने नागरिक हैराणमासळ परिसरात पावसाच्या दीर्घकालीन विश्रांतीने वातावरणात उकाडा वाढला आहे. १५ ते २० दिवसांपासून परिसरात पाऊस बेपता झाला आहे. वातावरण बदलामुळे ऊन्ह तापत असून उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीसुद्धा १० ते ११ वाजेपर्यंत उकाडा कायम राहत असल्याने शाळकरी मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असह्य उकाड्यामुळे ताप, सर्दी, दुखणे, उलट्या अशा आजरांनी सुद्धा लोकांना ग्रासले आहे. त्यामुळे विशेषत: शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर फरक पडला आहे. वातावरणात बदल झाल्याने असह्य उकाड्याने अक्षरश: घामाच्या धारा वाहत असून नागरिक मात्र हैराण झाले आहेत.(वार्ताहर)