शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:34 IST

मागील तीनदिवसांपासून जिल्ह्यात सुसाट वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस असा स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस बरसल्याचेही प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यात गारपीट : दिवसा उन्हाचे चटके तर सायंकाळी गारवा, आजाराला मिळतेय खतपाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीनदिवसांपासून जिल्ह्यात सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस असा स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस बरसल्याचेही प्राथमिक माहिती आहे.परिणामी ऐन रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. गहू कापणीचा हंगाम तोंडावर असतांना या पावसामुळे हातचे पिक तर जाणार नाही अशी भितीही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. वातावरणात अचानकपणे होत असलेल्या बदलावामुळे संसर्गजन्य आजारही बळावत असून खाजगी रुग्णालयसह सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.मासळ : काल रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास मासळ, बेलाटी, खैरी, घरतोडा परिसरात मेघगर्जनेसह गारांसह जोरदार पाऊस पडला सुमारे तासभर पावसाने वादळासहीत झोडपले. दिवसभर ऊन होती पण सायंकाळी अधूनमधुन ढग यायला सुरुवात झाली व रात्री वादळासह जोराचा पाऊस झाला. ह्या अवकाळी पावसाने जरी शेतकऱ्यांना नुकसान झाला नसला तरी बेमोसमी पावसाने जनसामान्याची चिंता वाढली आहे. भर उन्हाळ्यात जोराचा पाऊस आल्याने पावसाळ्यात मात्र निसर्गराजा दगा देईल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाचे चटके कमी झाले आहेत. रब्बी पिके जवळपास काढून झाल्याने या पावसाचा खुप जास्त विपरित परिणाम झालेला नाही.पालांदूर : दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. यापावसामुळे आठवडी बाजारावर परिणाम जाणवला. भाजीपाला उत्पादकांनाही याचा फटका बसला आहे. सुसाट वाºयामुळे रात्रभर विज पुरवठाही बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा फटका सहन करावा लागला.लाखांदुर : तालुक्यात तिन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, शनिवारी (ता.१४) सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन् अवकाळी पाऊस असे चित्र होते. दिघोरी/मो, मासळ, सोनी, मोहरणा, सरांडी/बु, विहीरगाव, बारव्हा यासह तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. सायंकाळी सहाच्या सुमारास तिन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला.संपूर्ण तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. वाºयामुळे अनेक भागांत पत्रे उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळली. लाखांदुर शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह वादळी वाº्याला सुरवात झाली. त्यामुळे सर्वत्र धुळीचे प्रचंड लोट उठले होते.जागोजागी साचलेला कचराही विखुरला. वेगवान वादळी वाऱ्याने काही काळ वाहतुक ठप्प राहिली. या वातावरणामुळे आंबा, कांदा, धान बियाणे आदींचे नुकसान झाले. हळदीचे पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. ईटान, भागडी, मांढळ, दांडेगाव, खैरी/पट, बोथली, कुडेगाव, गवराळा, डांभेविरली येथे विट भट्टी असून कच्च्या विटांवर पाणी गेल्याने विटा जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. तर खोलमारा येथे मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जात असून, कारले, चवळी या पिकांची बाग वादळी वाºयासह गारपिटीने उद्ध्वस्त झाली आहे.फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात गारपिटीने कहर केला होता. त्यात कडधान्याचे मोठे नुकसान होऊन उत्पन्न कमी आले होते. त्यानंतर आता पुन्हा गारपिटीने झोडपले आहे. शनिवारी दुपारनंतर तालुक्यात सर्वञ ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. गारपिटीच्या तडाख्यात बाजार समितीमधील शेतमाल सापडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.