शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस २९ %, जलसाठा १९ %, रोवणी शून्य

By admin | Updated: July 9, 2014 23:16 IST

कधी नव्हे एवढ्या कमी पावसाची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत १६० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना यावर्षी केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे.

भंडारा : कधी नव्हे एवढ्या कमी पावसाची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत १६० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना यावर्षी केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.दुष्काळाचे सावटभंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी खरीपाचे पीक संकटात सापडले आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर झाले गेले दु:ख विसरुन यावर्षी जोमाने कामाला लागला होता. महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, परंतु निसर्ग दगा देत आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. हंगाम लांबत आहे. त्यामुळे उत्त्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी यावेळी ४० ते ५० टक्के रोवणी होते. परंतु पऱ्हेच नाहीतर रोवणीचा प्रश्नच उद्भवत नाही. जलाशयाची स्थिती भीषणभंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी पेरणी आणि रोवणीसाठी मिळत असला तरी चिखलासाठी आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)