शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:54 IST

गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पऱ्हे सडण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पऱ्हे घातले. मात्र पऱ्हे उगवल्यानंतर आठवडाभरातच पावसाने पाच सहा दिवस सातत्याने हजेरी लावली. परिणामी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हे पाणी शेतातून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेताना जलाशयाचे स्वरुप आले असून पाच सहा दिवस साचलेल्या पाण्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेशरमची झाडे वाढलेली आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हे नाले बुजलेले आहेत. पावसाळ्यामुळे या नाल्यांमधून पाणी वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.तसेच या मार्गातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालवा वितरिकेचे काम ठिकठिकाणी रखडलेले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. परिणामी काठावरील आणि वितरिकेच्या शेजारील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या पावसामुळे ज्या पंपधारक शेतकºयांनी हंगामाच्या सुरुवातीलाच पऱ्हे घातले होते. पंपधारक शेतकऱ्यांचे रोवणे जोमात सुरु आहेत.