शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पावसाने धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:54 IST

गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : पऱ्हे सडण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या पाच सहा दिवसापासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी निघणे दुरापास्त झाल्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पऱ्हे घातले. मात्र पऱ्हे उगवल्यानंतर आठवडाभरातच पावसाने पाच सहा दिवस सातत्याने हजेरी लावली. परिणामी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हे पाणी शेतातून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेताना जलाशयाचे स्वरुप आले असून पाच सहा दिवस साचलेल्या पाण्यामुळे पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेशरमची झाडे वाढलेली आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हे नाले बुजलेले आहेत. पावसाळ्यामुळे या नाल्यांमधून पाणी वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.तसेच या मार्गातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालवा वितरिकेचे काम ठिकठिकाणी रखडलेले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. परिणामी काठावरील आणि वितरिकेच्या शेजारील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या पावसामुळे ज्या पंपधारक शेतकºयांनी हंगामाच्या सुरुवातीलाच पऱ्हे घातले होते. पंपधारक शेतकऱ्यांचे रोवणे जोमात सुरु आहेत.