शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पावसाने पाठ फिरविली, धानशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:15 IST

गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देयंदाही दुष्काळच सांगाती : शेतातील भेगांनी बळीराजाचे काळीज फाटले

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीलपासूनच पावसाने वेळोवेळी समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. भरघोस उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या धानरोवणीला रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने कायमच दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे धानशेतीला भेगा पडल्या असून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. या परिसरात सद्यस्थितीत दमदार पावसाची गरज असून येत्या पाच दिवसात पाऊस न झाल्यास धान उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यस्थितीत या परिसरावर दुष्काळाची छाया पसरली आहे.या परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या अनेक वितरिका वाहात आहेत. मात्र, या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी या वितरिकांमधील पाण्यासाठी शेतकºयांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत. दरम्यान शेतकरीवर्ग रात्री बेरात्री आटापीटा करून परिसरातील नाल्यांवर आणि वितरिकांवर मोटारपंप इंजिन लावून आपल्या धानशेतीची तहाण भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, डाव्या कालव्याच्या या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.भारनियमणाने वाढविली डोकेदुखीसध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत १६ तासांचे भारनियमन सुरू असून शेतीला केवळ आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारपंपधारक शेतकरी आहेत. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी अद्याप वाढली नसल्याने या विहिरींमधून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनी रात्री ९ ते १२ च्या दरम्यान शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरू करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतावर ये-जा करावी लागते. या धावपळीत साप, विंचू आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका पोहचू शकतो. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान शेतीसाठी विज पुरवठा सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.