शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पावसाने पाठ फिरविली, धानशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:15 IST

गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देयंदाही दुष्काळच सांगाती : शेतातील भेगांनी बळीराजाचे काळीज फाटले

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीलपासूनच पावसाने वेळोवेळी समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. भरघोस उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या धानरोवणीला रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने कायमच दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे धानशेतीला भेगा पडल्या असून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. या परिसरात सद्यस्थितीत दमदार पावसाची गरज असून येत्या पाच दिवसात पाऊस न झाल्यास धान उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यस्थितीत या परिसरावर दुष्काळाची छाया पसरली आहे.या परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या अनेक वितरिका वाहात आहेत. मात्र, या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी या वितरिकांमधील पाण्यासाठी शेतकºयांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत. दरम्यान शेतकरीवर्ग रात्री बेरात्री आटापीटा करून परिसरातील नाल्यांवर आणि वितरिकांवर मोटारपंप इंजिन लावून आपल्या धानशेतीची तहाण भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, डाव्या कालव्याच्या या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.भारनियमणाने वाढविली डोकेदुखीसध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत १६ तासांचे भारनियमन सुरू असून शेतीला केवळ आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारपंपधारक शेतकरी आहेत. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी अद्याप वाढली नसल्याने या विहिरींमधून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनी रात्री ९ ते १२ च्या दरम्यान शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरू करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतावर ये-जा करावी लागते. या धावपळीत साप, विंचू आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका पोहचू शकतो. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान शेतीसाठी विज पुरवठा सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.