शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

पावसाची पाठ, धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 30, 2014 01:40 IST

मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने परिसरातील धानपिक धोक्यात आले असून या परिसरावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.

विरली (बु.) : मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने परिसरातील धानपिक धोक्यात आले असून या परिसरावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.यावर्षी हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना आशा दाखविली. शेतकऱ्यांनी कसेबसे आपले रोवणे आटोपले. मात्र गेल्या २०-२५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले असून शेतकऱ्यांनी रोवण्यासाठी आणि रासायनिक खतांसाठी केलेला खर्च व्यर्थ जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोटारपंपाद्वारे पाणीपुरवठा करून आपले पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. मात्र वेळी अवेळी होत असलेल्या विद्युत भारनियमनामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी, शेतकरी पुरता हतबल झाला असून पीक कसे वाचविता येईल या विवंचनेत सापडला आहे. मोटारपंपधारक शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने केवळ निसर्गावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांची आपले पीक वाचविण्याची आशा मावळली आहे. शेतकऱ्यांची यावर्षीही सुटका कठीण असून आधीच कर्जाच्या ओझ्याने बुजबुजलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. शासनाने लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)