शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

बावनथडी वितरिकेच्या कामाला रेल्वेचा ‘खो’

By admin | Updated: May 6, 2015 00:47 IST

मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित ..

विभागाचे दुर्लक्ष : अनेक गावे सिंचनापासून वंचितमोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहे. वितरीकेचे गाळे तयार करण्याकरिता संबंधित विभागसुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. सन २०१२-१३ मध्ये तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही गावांना प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. अनेक गावात वितरीकेची कामे रखडली आहेत. देव्हाडी परिसरात रेल्वे ट्रक छेदून मुख्य वितरिका पलीकडे नेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली नाही. मुख्य वितरिकेचे काम रखडले आहे.मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर पलीकडे मुख्य वितरीकेच्या कामाला रेल्वे प्रशासनाने ‘खो’ दिला आहे. रेल्वे ट्रक पलीकडे २० ते २५ गावे यामुळे सिचंनापासून वंचित आहेत. देव्हाडी-माडगी सिवनी शिवारात रेल्वे ट्रॅकपर्यंत दोन्ही बाजूचे बहुतांश प्रकल्पाची कामे झाली आहेत. रेल्वे ट्रॅकपर्यंत येऊन ती थांबली आहे. बावनथडी प्रकल्प अधिका-यांचे येथे नियोजनही चुकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. वितरिका जेथून रेल्वे ट्रॅक खालून जाण्याचे निश्चित करण्यात आले. त्या स्थळापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. या नाल्याखालून मोठया जलवाहिन्या घालून वितरीकेत पुढे पाणी सोडले जाऊ शकत होते. १०० ते १५० मीटर अंतरावर रेल्वे ट्रक खालून वितरिका कामाला मंजूरी देण्यात येऊ शकते काय? याचा विचार रेल्वे प्रशासन करीत असल्याचे समजते.गोसेखुर्द प्रकल्प बांधकामाची सध्या चौकशी सुरु आहे. बावनथडी प्रकल्प सुमारे ३५ वर्षांपुर्वी सुरु झाला होता. निधी अभावी हा प्रकल्प रखडत गेला. संपूर्ण बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामावर लक्ष घातल्यास विना महत्वाची कामे आधी करण्यात आली. यात मलाईदार कामांचा समावेश आहे. रस्त्यावरील पूल, लहान वितरिीेवरील गेट, पुलाचा समावेश आहे. आदिवासी मंत्र्यांना निवेदनलेंडेझरी येथे सोमवारी आदिवासी बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्याचे आदीवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. परिसरातील प्रकल्पग्रस्त बांधवानी जमिनीच्या मोबदला व पुर्नवसनबाबद मंत्र्यांना निवेदन दिले. ना. आत्राम यांनी जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.