शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी वितरिकेच्या कामाला रेल्वेचा ‘खो’

By admin | Updated: May 6, 2015 00:47 IST

मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित ..

विभागाचे दुर्लक्ष : अनेक गावे सिंचनापासून वंचितमोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहे. वितरीकेचे गाळे तयार करण्याकरिता संबंधित विभागसुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. सन २०१२-१३ मध्ये तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही गावांना प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. अनेक गावात वितरीकेची कामे रखडली आहेत. देव्हाडी परिसरात रेल्वे ट्रक छेदून मुख्य वितरिका पलीकडे नेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली नाही. मुख्य वितरिकेचे काम रखडले आहे.मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर पलीकडे मुख्य वितरीकेच्या कामाला रेल्वे प्रशासनाने ‘खो’ दिला आहे. रेल्वे ट्रक पलीकडे २० ते २५ गावे यामुळे सिचंनापासून वंचित आहेत. देव्हाडी-माडगी सिवनी शिवारात रेल्वे ट्रॅकपर्यंत दोन्ही बाजूचे बहुतांश प्रकल्पाची कामे झाली आहेत. रेल्वे ट्रॅकपर्यंत येऊन ती थांबली आहे. बावनथडी प्रकल्प अधिका-यांचे येथे नियोजनही चुकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. वितरिका जेथून रेल्वे ट्रॅक खालून जाण्याचे निश्चित करण्यात आले. त्या स्थळापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. या नाल्याखालून मोठया जलवाहिन्या घालून वितरीकेत पुढे पाणी सोडले जाऊ शकत होते. १०० ते १५० मीटर अंतरावर रेल्वे ट्रक खालून वितरिका कामाला मंजूरी देण्यात येऊ शकते काय? याचा विचार रेल्वे प्रशासन करीत असल्याचे समजते.गोसेखुर्द प्रकल्प बांधकामाची सध्या चौकशी सुरु आहे. बावनथडी प्रकल्प सुमारे ३५ वर्षांपुर्वी सुरु झाला होता. निधी अभावी हा प्रकल्प रखडत गेला. संपूर्ण बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामावर लक्ष घातल्यास विना महत्वाची कामे आधी करण्यात आली. यात मलाईदार कामांचा समावेश आहे. रस्त्यावरील पूल, लहान वितरिीेवरील गेट, पुलाचा समावेश आहे. आदिवासी मंत्र्यांना निवेदनलेंडेझरी येथे सोमवारी आदिवासी बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्याचे आदीवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. परिसरातील प्रकल्पग्रस्त बांधवानी जमिनीच्या मोबदला व पुर्नवसनबाबद मंत्र्यांना निवेदन दिले. ना. आत्राम यांनी जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.