शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रबी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मदतीची मागणी : वर्षअखेरीसही कर्जाचा विळखा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील खमारी, आंबाडी, भिलेवाडा, पिंडकेपार, सालेबर्डी, गुंथारा, धारगाव, करचखेडा, सिंगोरी, पलाडी, आमगाव, उसरागोंदी, टेकेपार डोडमाझरी, दिघोरी आदी परिसरातील पिकांचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.खरीप हंगामातील परतीच्या पावसाचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी सातत्याने संकटात सापडलेला बळीराजा अद्यापही बाहेर निघू शकला नाही. अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाख्याने जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी हंगामातील पीकांची काढणीची लगबग सुरु असतानाच अवकाळीच्या तडाख्याने पीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे रबी पिकांच्या उत्पादनात सुमारे ७० टक्के घट झाली असल्याची माहिती आहे.शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावर्षी सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. गत आठवड्याभरापासून अनेकवेळा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने यात आणखीच भर पडली आहे.सततच्या पावसाने शेतकरी त्रस्तलाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांसह गहू, हरभरा पीके संकटात सापडली आहे. अनेक ठिकाणी गहे काळवंडला असून कापणी केलेल्या रबी पिकांचा कडपा भिजल्याने शेतकरी धास्तावले आहे. एकाच आठवड्यात दोनदा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कायम राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती