शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली.

ठळक मुद्देगारांचा वर्षाव : गहू, हरभरा झोपला, धानाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी जिल्ह्यात गारांसह झालेल्या अवकाळी पावसाचा रबी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील काही भागात गहू, हरभरा झोपला असून उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. भंडारा शहरासह ठाणा, अड्याळ, तुमसर, पालांदूर, साकोली, मोहाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली. शेतात गहू, चना, हरभरा आणि भाजीपाल्याचे पीक असून ते पूर्णत: भूईसपाट झाले. गत आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. आष्टी परिसरात गारांसह दमदार पावसाने हजेरी लावली.पवनी तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने कापणीला आलेल्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले असताना आता पुन्हा या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आसगाव परिसरात रविवारपासून दररोज पाऊस कोसळत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार या तीन दिवसात झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, मुग, लाखोळी या पिकांना फटका बसला. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर ठाणा परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. यात ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. या परिसरात गहू गर्भावस्थेत असून त्याचे मोठे नुकसान झाले. संबंधित तलाठी सर्वेक्षण करीत आहेत. लाखांदूर तालुक्यात होळीच्या पूर्वसंध्येला आणि १० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या रबी पिकांची कापणी झाली असून अनेक शेतकरी मळणीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अवकाळी पावसाने काढलेले पीक ओले झाले असून अनेक शेतकºयांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर असलेल्या धानालाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील कºहांडला येथे वाटाणा पिकाचे मोठे नुकसान झाले.भंडारा शहरात गारांचा वर्षावहवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गत तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तब्बल एक तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात होऊन काही भागात गारांचा वर्षाव झाला. ढगाळ वातावरण आणि दिवसा तापणाºया उन्हाचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गारांसह अवकाळी पावसाने थैमान घातले. खराडी, चिखली, राजेदहेगाव परिसरातील गहू, हरभरा पीक भूईसपाट झाले. गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. आता उरलेला हरभरा या पावसात भूईसपाट झाला आहे.