शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रबी पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली.

ठळक मुद्देगारांचा वर्षाव : गहू, हरभरा झोपला, धानाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी जिल्ह्यात गारांसह झालेल्या अवकाळी पावसाचा रबी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील काही भागात गहू, हरभरा झोपला असून उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. भंडारा शहरासह ठाणा, अड्याळ, तुमसर, पालांदूर, साकोली, मोहाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली. शेतात गहू, चना, हरभरा आणि भाजीपाल्याचे पीक असून ते पूर्णत: भूईसपाट झाले. गत आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. आष्टी परिसरात गारांसह दमदार पावसाने हजेरी लावली.पवनी तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने कापणीला आलेल्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले असताना आता पुन्हा या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आसगाव परिसरात रविवारपासून दररोज पाऊस कोसळत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार या तीन दिवसात झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, मुग, लाखोळी या पिकांना फटका बसला. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर ठाणा परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. यात ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. या परिसरात गहू गर्भावस्थेत असून त्याचे मोठे नुकसान झाले. संबंधित तलाठी सर्वेक्षण करीत आहेत. लाखांदूर तालुक्यात होळीच्या पूर्वसंध्येला आणि १० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या रबी पिकांची कापणी झाली असून अनेक शेतकरी मळणीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अवकाळी पावसाने काढलेले पीक ओले झाले असून अनेक शेतकºयांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर असलेल्या धानालाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील कºहांडला येथे वाटाणा पिकाचे मोठे नुकसान झाले.भंडारा शहरात गारांचा वर्षावहवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गत तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तब्बल एक तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात होऊन काही भागात गारांचा वर्षाव झाला. ढगाळ वातावरण आणि दिवसा तापणाºया उन्हाचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गारांसह अवकाळी पावसाने थैमान घातले. खराडी, चिखली, राजेदहेगाव परिसरातील गहू, हरभरा पीक भूईसपाट झाले. गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. आता उरलेला हरभरा या पावसात भूईसपाट झाला आहे.