शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 9, 2016 00:27 IST

गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता.

खापरी येथे सभा : उपजिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आश्वासनपवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. गावठाणासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होत नसल्याने स्वेच्छा पुनर्वसनाचा मुद्दा समोर आलेला होता. ग्रामसभेत ७० टक्के ग्रामस्थांनी स्वेच्छा पुनर्वसनाची तयारी दाखविल्यामुळे जिल्हा प्रशासन व पुनर्वसन विभागाने संयुक्त सभा आयोजित करुन स्वेच्छा पुनर्वसन पाहिजे असल्यास तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे.खापरी (रेहपाडे) गाव गोसेखुर्द धरण व उमरेड - कऱ्हांडला-पवनी अभयारण्यामुळे प्रभावित झालेला आहे. गावाचे एका बाजुला धरणामध्ये साठविलेले पाणी व दुसरी बाजूला अभयारण्याचे जंगल व त्यातील हिंस्त्र प्राण्यापासून उद्भवणारा त्रासामुळे ग्रामस्थ भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे ही त्यांची रास्त अपेक्षा आहे. गावातील बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनासाठी आवेदनपत्र भरुन दिल्यामुळे खात्री करण्याच्या उद्देशाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसन विभागाने गावात शनिवारला सभेचे आयोजन केले होते. सभेला उपस्थित उपजिल्हाधिकारी विजया बनकर, कार्यकारी अभियंता काळे, तहसिलदार एस. के.वासनिक, गट विकास अधिकारी बी. वाय. निमसरकार व सरपंच रेहपाडे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी ग्रामस्थांकडून गावठाण की स्वेच्छा पुनर्वसन ते जाणून घेतले. बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनास होकार दिल्याने येत्या तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागु शकतो. तसेच ज्यांना भुखंड पाहिजे आहे त्यांना उपलब्ध गावठाणामध्येच भुखंड उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वस्थ केले. संपूर्ण गावास गावठाण पाहिजे असल्यास पुन्हा पाचवर्षे पुनर्वसनासाठी लागु शकतात अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)