शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

खापरी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:23 IST

गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असलेल्या खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसन कुठे व कसे करावे, यासंदर्भात ग्रामस्थ, भूअर्जन अधिकारी व गोसेखुर्द पुनर्वसन....

प्रकल्पग्रस्तांशी चर्चा : नाना पटोले यांचे आश्वासनपवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असलेल्या खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसन कुठे व कसे करावे, यासंदर्भात ग्रामस्थ, भूअर्जन अधिकारी व गोसेखुर्द पुनर्वसन विभाग यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनास विलंब लागत असल्याने स्वेच्छा पुनर्वसन करावी, अशी मागणी झाली. त्यानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करून ठराव संमत करण्यात आला तरीसुद्धा कुटुंबाची माहिती उपलब्ध नाही, असे कारण पुढे करून संबंधित अधिकारी पुनर्वसनाचे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.परसोडी खापरी येथील रूपचंद माटे या इसमाचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांचे सांत्वन करून शासकीय मदत देऊन परत येत असताना खापरी रेहपाडे येथील ग्रामस्थांनी खासदार नाना पटोले यांना थांबवून पुनर्वसनाची व्यथा सांगितली. गोसेखुर्द धरणात साठविलेले पाणी व उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोहोमुळे नागरिक त्रस्त असल्याने शक्य तितक्या लवकर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता खासदार नाना पटोले यांनी गोसीखुर्दचे पुनर्वसन विभाग तसेच उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोन्ही विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन नागरिकांसोबत झालेल्या चर्चेत दिले. पुनर्वसनाचा जास्तीत जास्त लाभ बाधीत कुटुंबांना मिळावा, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी जि.प.माजी सभापती हंसा खोब्रागडे, उमरेड-कऱ्हांडला वनजीव विभागाचे डीएओ भलावी, गोसीखुर्द धरण विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष बिसन शेंडे, सचिव जितेंद्र रेहपाडे, मनोहर सुर्यवंशी, डॉ. सुनिल जीवनतारे, उपसरपंच सुखराम वटी, नरेश रेहपाडे, प्रकाश रेहपाडे, अशोक भोयर, पांडू भोयर, अ‍ॅड. जनार्धन जीवनतारे व ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)